शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

शेतकरी पुन्हा सावकारी पाशात

By admin | Updated: November 15, 2015 00:11 IST

दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली.

संस्कृती जपण्याचा परिणाम : कर्जाचा डोंगर कायमसुमित हरकुट चांदूरबाजारदुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली. जीवनात आनंद कसा उपभोगायचा याचे खरे शिक्षण शेतकऱ्यांकडून घेता येईल. जिवनाचे खरे सत्य त्यांनाच उलगडले आहे. कारण सर्वपरिस्थितीत संस्कार आणि प्रथा या गोष्टीची खऱ्या अर्थाने जतन करणारी मानवजात म्हणजे शेतकरी होय. सुख व शांतीचे प्रतीक म्हणून दिवाळी या सणाची ओळख आहे. या दिवशी आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठानाची, घराची सफासफाई करून रंगरंगोटी करतात. चिमुकल्यांसाठी नवनवीन कपडे खरेदी करतात. सर्वीकडे रोषणाईचा झगमगाट केला जातो, तर सणासुदीनिमित्त घरात फराळ व गोड पदार्थ बनविल्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु या परंपरा जपण्याकरिता अखेर पैसा लागतो. सतत तीन वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे जगाचा पोशिंदा सावकाराच्या दारातमदतीसाठी भटकत आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतीतून उत्पादन खर्चसुद्धा निघालेला नाही. बँकेचे कर्ज काढून पेरलेले सोयाबीन पीक हातातून गेल्यामुळे दिवाळी साजरी करावी कशी, असा गहण प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव खासगी सावकारांच्या दारावर सण साजरा करण्याकरिता जाण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. संत्रा या पिकाचीसुद्धा हीच स्थिती निर्माण झाली असून संत्रा व्यापारी संत्रा बागेकडे फिरतसुद्धा नसल्यामुळे तालुक्यातील कित्येक संत्रा बागेत संत्रा तसाच पडून आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेल्या कापूस हे पीक दिवाळीनंतर येत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे. असे असले तरी आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकरिता बळीराजा सावकाराच्या दारी जाऊन पैशाची मागणी करीत असल्याचे चित्र आहे. सणासुदीत हा पोशिंदा पोटाला चिमटा घेऊन परिवाराच्या संसाराचा गाडा चालवित आहे. संस्कृतीचे जतन करीत आहे. मात्र प्रथा राबवीत असताना स्वत:च्या जीवनाचे वाटोळे करीत आहे. एकंदरीत शासनाकडून मिळणारे आश्वासनांपेक्षा शासनाकडून मिळणारी मदतच त्यास आवश्यक आहे. कारण पैशाचे काम अखेर पैसाच करतो, आश्वासन नाही.