शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

शेतकरी पुन्हा सावकारी पाशात

By admin | Updated: November 15, 2015 00:11 IST

दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली.

संस्कृती जपण्याचा परिणाम : कर्जाचा डोंगर कायमसुमित हरकुट चांदूरबाजारदुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली. जीवनात आनंद कसा उपभोगायचा याचे खरे शिक्षण शेतकऱ्यांकडून घेता येईल. जिवनाचे खरे सत्य त्यांनाच उलगडले आहे. कारण सर्वपरिस्थितीत संस्कार आणि प्रथा या गोष्टीची खऱ्या अर्थाने जतन करणारी मानवजात म्हणजे शेतकरी होय. सुख व शांतीचे प्रतीक म्हणून दिवाळी या सणाची ओळख आहे. या दिवशी आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठानाची, घराची सफासफाई करून रंगरंगोटी करतात. चिमुकल्यांसाठी नवनवीन कपडे खरेदी करतात. सर्वीकडे रोषणाईचा झगमगाट केला जातो, तर सणासुदीनिमित्त घरात फराळ व गोड पदार्थ बनविल्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु या परंपरा जपण्याकरिता अखेर पैसा लागतो. सतत तीन वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे जगाचा पोशिंदा सावकाराच्या दारातमदतीसाठी भटकत आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतीतून उत्पादन खर्चसुद्धा निघालेला नाही. बँकेचे कर्ज काढून पेरलेले सोयाबीन पीक हातातून गेल्यामुळे दिवाळी साजरी करावी कशी, असा गहण प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव खासगी सावकारांच्या दारावर सण साजरा करण्याकरिता जाण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. संत्रा या पिकाचीसुद्धा हीच स्थिती निर्माण झाली असून संत्रा व्यापारी संत्रा बागेकडे फिरतसुद्धा नसल्यामुळे तालुक्यातील कित्येक संत्रा बागेत संत्रा तसाच पडून आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेल्या कापूस हे पीक दिवाळीनंतर येत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे. असे असले तरी आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकरिता बळीराजा सावकाराच्या दारी जाऊन पैशाची मागणी करीत असल्याचे चित्र आहे. सणासुदीत हा पोशिंदा पोटाला चिमटा घेऊन परिवाराच्या संसाराचा गाडा चालवित आहे. संस्कृतीचे जतन करीत आहे. मात्र प्रथा राबवीत असताना स्वत:च्या जीवनाचे वाटोळे करीत आहे. एकंदरीत शासनाकडून मिळणारे आश्वासनांपेक्षा शासनाकडून मिळणारी मदतच त्यास आवश्यक आहे. कारण पैशाचे काम अखेर पैसाच करतो, आश्वासन नाही.