शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा !

By admin | Updated: August 8, 2015 00:26 IST

तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली.

दिलासा : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत क्रांतिदिनी गृहप्रवेशवरुड : तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता माणूस निघून गेलल्यावर तीन मुलीसह पत्नीचा संसार उघड्यावर आला होता. दोन वेळची पोटची खळगी भरण्यासाठी अन्न व डोक्यावर साधे छप्पर ही नव्हते. पतीच्या निधनानंजर ढोक परिवार बेघर झाला होता. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी घेऊन रमाबाईला हक्काचे घर उभारुन दिले. तसेच मुलींचा शिक्षणाचा भार उचलला. यामुळे क्रांतीदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे ढोक परिवाराला घर हस्तांतरित करणार आहे.खानापूर येथील शिवहरी ढोक या शेतकऱ्याकडे पावणेतीन एकर कोरडवाहू जमीन होती. कपाशी, तूर पेरली. मात्र निसर्गाच्या अवकृपेने संपुर्ण पीक बुडाले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढला. परिवारातील तीन मुलींचे शिक्षण कसे करावे? कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न निर्माण झाला. यातच घरबांधणीकरिता एका कंपनीचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीकरिता सततचा तगादा सुरु झाल्याने ते निराशेच्या गर्तेत आले होते. अखेर शेतात विष प्राशन करून ५ एप्रिलला त्यांनी जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने डिंपल, श्वेता संवदा या तीन मुलीसह पत्नी रमाबाई व्यथित झाली होती. ग्रामस्थांनी मदत करुन दुसऱ्याच ेघरात आश्रय दिला. शेतकरी आत्महत्या ग्रस्त ढोक परिवारावर दु:खाचे सावट होते. सरकारने काही प्रमाणात धान्य देऊन बोळवण केल्यागत प्रकार घडला होता. लोकप्रतिनीधींनी अल्पशी मदत केली होती. परंतु निवारा नसल्याने या परिराची कुचंबणा होती. एक महिण्यापूर्वी खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर वरुडला आले असता ढोक परिवाराची व्यथा ऐकून नि:शब्द झाले होते. थेट खानापूर गाठून ढोक परिवाराची डोळे पाणावणारी दु:खद कहाणी ऐकली तेव्हा तिन्ही तरुण मुलींनी केवळ आम्हाला स्नानगृह आणि शौचालय बांधून द्या अशी विनवणी केली. तेव्हा खा. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या वर्गणी आणि श्रमदानातून सर्वसोयीचा निवारा उभारुन रमाबाई आणि तीन मुलींना कायमचा निवारा बांधून दिले. (तालुका प्रतिनिधी)