शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

By admin | Updated: May 29, 2014 01:36 IST

बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर

अमरावती : बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या अनुषंगाने शेती आधारित व शेती संलग्न उद्योगांना चालना देण्यासाठी शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीचा उपक्रम कृषी विभागाद्वारा यंदा राबविण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांची कमी होत असलेली शेती जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठय़ास येत असलेल्या र्मयादा, तांत्रिक कारणास असलेला अपुरा वाव, तसेच जमिनीची कमी होत जात असलेली उत्पादकता व सद्यस्थितीमध्ये कृषी विस्तारास असणार्‍या र्मयादा आदी सर्व अनुषंगिक बाबीचा विचार करुन गट शेतीस चालना देण्याचा शासनाचा हा उपक्रम आहे. शेतकर्‍यांच्या समूह व गट शेतीस चालना देण्यासाठी राज्य शासनाची १00 टक्के पुरस्कृत योजना आहे. शेतकर्‍यांचे समूह तयार करुन समूह शेतीद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. सन २0१४-१५ चा आर्थिक वर्षात राज्यामधील ३३ जिल्हय़ात राबविण्यात येत असून याकरिता ५0 लक्ष रुपये शासनाने मंजुर केले आहे.

सन २0१४-१५ शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीस चालना देणार्‍या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शेतकरी समुहाला लागणारे प्रशिक्षण, कौशल्य वृध्दी, श्ेातकरी अभ्यास दौरा, प्र-क्षेत्र भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन व शेती आधारीत उद्योगांना चालना देणे व त्याचा दर्जा वाढविणे आणि या व्दारेच उत्पादनास अधिकाधिक भाव मिळावा हा समूह गट शेतीस प्रोत्साहन देण्यामागच्या योजनेचे उद्देश आहे. (प्रतिनिधी)