शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

By admin | Updated: May 29, 2014 01:36 IST

बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर

अमरावती : बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या अनुषंगाने शेती आधारित व शेती संलग्न उद्योगांना चालना देण्यासाठी शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीचा उपक्रम कृषी विभागाद्वारा यंदा राबविण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांची कमी होत असलेली शेती जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठय़ास येत असलेल्या र्मयादा, तांत्रिक कारणास असलेला अपुरा वाव, तसेच जमिनीची कमी होत जात असलेली उत्पादकता व सद्यस्थितीमध्ये कृषी विस्तारास असणार्‍या र्मयादा आदी सर्व अनुषंगिक बाबीचा विचार करुन गट शेतीस चालना देण्याचा शासनाचा हा उपक्रम आहे. शेतकर्‍यांच्या समूह व गट शेतीस चालना देण्यासाठी राज्य शासनाची १00 टक्के पुरस्कृत योजना आहे. शेतकर्‍यांचे समूह तयार करुन समूह शेतीद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. सन २0१४-१५ चा आर्थिक वर्षात राज्यामधील ३३ जिल्हय़ात राबविण्यात येत असून याकरिता ५0 लक्ष रुपये शासनाने मंजुर केले आहे.

सन २0१४-१५ शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीस चालना देणार्‍या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शेतकरी समुहाला लागणारे प्रशिक्षण, कौशल्य वृध्दी, श्ेातकरी अभ्यास दौरा, प्र-क्षेत्र भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन व शेती आधारीत उद्योगांना चालना देणे व त्याचा दर्जा वाढविणे आणि या व्दारेच उत्पादनास अधिकाधिक भाव मिळावा हा समूह गट शेतीस प्रोत्साहन देण्यामागच्या योजनेचे उद्देश आहे. (प्रतिनिधी)