शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोराळा येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:35 IST

आपल्या साडेतीन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन व तुरीची लागवड केली.

बेलोरा (अमरावती) : सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सडल्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील युवा शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ४ च्या सुमारास उघड झाली. सुरेंद्र ऊर्फ गणेश वसंतराव इंगोले (३९), असे मृत शेतकºयाचे नाव आहे.

आपल्या साडेतीन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन व तुरीची लागवड केली. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीन सवंगणी करून त्याची शिवारातच गंजी लावली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ते शेतात गेले असता, परतीच्या पावसाने त्यातील काही सोयाबीन सडल्याचे दिसून आल्यामुळे ते विचारमग्न स्थितीत तासाभरात घरी पोहोचले व घरातच विषारी द्रव्य प्राशन केले.

कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचेवर सोसायटी व एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज होते. सोयाबीन हातचे गेल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी आत्मघात केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास जमादार विनोद बोबडे करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी