शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

शेतमालाचे भाव घसरले, शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

मोर्शी : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जून महिन्यात विदर्भात पेरणीला सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. काही शेतकरी आपला शेतमाल विकून धान्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे. परंतु बाजार समितीत बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे. वाढती महागाई कमी करण्याची निवडणुकीदरम्यान भाजपक्षाने घोषणा केली होती. दुसरीकडे केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत; तथापि उद्या व्यापाऱ्यांना, कारखानदारांना भाव कमी करण्याची तंबी केंद्र शासनाने दिलीच, आणि भाव कमी करणे भाग पडलेच तर सध्या चढ्या भावाने खरेदी केलेला शेतमाल पुढे स्वस्तात विकावा लागेल. परिणामी नुकसान सहन करावा लागेल या भीतीपोटी व्यापारी वाढीव भावात शेतमाल खरेदी करण्यास टाळत आहे. परप्रांतीय व्यापारी आणि अडत्यांनी शेतमाल खरेदीत हात आखूडता घेतल्याचे अमरावती बाजार समितीतील एका अडत्याने येथील शेतकरी आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश मानकर यांना सांगितले. पार्डी येथील नारायणराव कुकडे यांना आला. त्यांनी दीड एकरात उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले. त्यांना १५ क्विंटल भुईमुंगाच्या शेंगा झाल्या. मोर्शी बाजार समितीत शेंगा विकल्या जात नाही. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील बाजार समितीत भूईमुंग विक्री करीता नेला. तेथे भूईमुंगशेंगांना २१०० रुपये प्रतिव्किंटल भाव मिळाला. गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास ३५०० ते ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. कुकडे यांना भूईमुंगाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत पाणी आणि विजेचा खर्च, स्वत:ची मजुरी वगळता एकूण ३२ हजार रुपये खर्च आला. अमरावती जिल्ह्यात आधीच भूईमुगाचा पेरा कमी आहे. तरीही भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)