शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

शेतमालाचे भाव घसरले, शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

मोर्शी : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जून महिन्यात विदर्भात पेरणीला सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. काही शेतकरी आपला शेतमाल विकून धान्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे. परंतु बाजार समितीत बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे. वाढती महागाई कमी करण्याची निवडणुकीदरम्यान भाजपक्षाने घोषणा केली होती. दुसरीकडे केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत; तथापि उद्या व्यापाऱ्यांना, कारखानदारांना भाव कमी करण्याची तंबी केंद्र शासनाने दिलीच, आणि भाव कमी करणे भाग पडलेच तर सध्या चढ्या भावाने खरेदी केलेला शेतमाल पुढे स्वस्तात विकावा लागेल. परिणामी नुकसान सहन करावा लागेल या भीतीपोटी व्यापारी वाढीव भावात शेतमाल खरेदी करण्यास टाळत आहे. परप्रांतीय व्यापारी आणि अडत्यांनी शेतमाल खरेदीत हात आखूडता घेतल्याचे अमरावती बाजार समितीतील एका अडत्याने येथील शेतकरी आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश मानकर यांना सांगितले. पार्डी येथील नारायणराव कुकडे यांना आला. त्यांनी दीड एकरात उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले. त्यांना १५ क्विंटल भुईमुंगाच्या शेंगा झाल्या. मोर्शी बाजार समितीत शेंगा विकल्या जात नाही. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील बाजार समितीत भूईमुंग विक्री करीता नेला. तेथे भूईमुंगशेंगांना २१०० रुपये प्रतिव्किंटल भाव मिळाला. गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास ३५०० ते ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. कुकडे यांना भूईमुंगाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत पाणी आणि विजेचा खर्च, स्वत:ची मजुरी वगळता एकूण ३२ हजार रुपये खर्च आला. अमरावती जिल्ह्यात आधीच भूईमुगाचा पेरा कमी आहे. तरीही भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)