शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचे भाव घसरले, शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

मोर्शी : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जून महिन्यात विदर्भात पेरणीला सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. काही शेतकरी आपला शेतमाल विकून धान्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे. परंतु बाजार समितीत बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे. वाढती महागाई कमी करण्याची निवडणुकीदरम्यान भाजपक्षाने घोषणा केली होती. दुसरीकडे केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत; तथापि उद्या व्यापाऱ्यांना, कारखानदारांना भाव कमी करण्याची तंबी केंद्र शासनाने दिलीच, आणि भाव कमी करणे भाग पडलेच तर सध्या चढ्या भावाने खरेदी केलेला शेतमाल पुढे स्वस्तात विकावा लागेल. परिणामी नुकसान सहन करावा लागेल या भीतीपोटी व्यापारी वाढीव भावात शेतमाल खरेदी करण्यास टाळत आहे. परप्रांतीय व्यापारी आणि अडत्यांनी शेतमाल खरेदीत हात आखूडता घेतल्याचे अमरावती बाजार समितीतील एका अडत्याने येथील शेतकरी आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश मानकर यांना सांगितले. पार्डी येथील नारायणराव कुकडे यांना आला. त्यांनी दीड एकरात उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले. त्यांना १५ क्विंटल भुईमुंगाच्या शेंगा झाल्या. मोर्शी बाजार समितीत शेंगा विकल्या जात नाही. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील बाजार समितीत भूईमुंग विक्री करीता नेला. तेथे भूईमुंगशेंगांना २१०० रुपये प्रतिव्किंटल भाव मिळाला. गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास ३५०० ते ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. कुकडे यांना भूईमुंगाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत पाणी आणि विजेचा खर्च, स्वत:ची मजुरी वगळता एकूण ३२ हजार रुपये खर्च आला. अमरावती जिल्ह्यात आधीच भूईमुगाचा पेरा कमी आहे. तरीही भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)