शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

३२० घरांची पडझड, ९१ हेक्टरमधील फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

(फोटो) अमरावती : शहरासह ग्रामीण भागात रविवारी दुपारी वादळासह पावसाने चांगलाच तडाखा दिला. यामध्ये जिल्ह्यात ३२० घरांची पडझड झाली, ...

(फोटो)

अमरावती : शहरासह ग्रामीण भागात रविवारी दुपारी वादळासह पावसाने चांगलाच तडाखा दिला. यामध्ये जिल्ह्यात ३२० घरांची पडझड झाली, तर ९१ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषिसहायक व तलाठी यांनी नुकसानाचा प्राथमिक अहवाल सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

जिल्ह्यात रविवारी दुपारी १ च्या सुमारास जोराच्या वाऱ्यासह पावसाने सुमारे अर्धा तास अमरावती शहरासह वरूड, अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. यामध्ये शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळले. यामध्ये दोन कार व दुचाकी दबल्या. याशिवाय ग्रामीणमधील अमरावती तालुक्यात दोन, वरूड तालुक्यात चार, अंजनगाव सुर्जी तालुक्यात दोन व अचलपूर तालुक्यात सात अशा एकूण १५ गावांमध्ये नुकसान झाले. सर्वाधिक २९४ घरांची पडझड वरूड तालुक्यात झाली. याशिवाय अमरावती तालुक्यात सात, दर्यापूर चार, अंजनगाव सुर्जी दोन, चांदूर बाजार तालुक्यात ११ व चिखलदरा तालुक्यात दोन घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

बॉक्स

संत्रा, केळी, कांद्याचे नुकसान

अमरावती तालुक्यात ६० आर, अंजनगाव तालुक्यात ३० हेक्टर, अचलपूर तालुक्यात १२ हेक्टर अशा ४२.६० हेक्टरमधील केळी, वरूड तालुक्यात ३२ हेक्टरमधील संत्रा व अचलपूर तालुक्यात १७ हेक्टरमधील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.