शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासकीय योजनांची जत्रा... लाभ मिळणार सतरा, नागरिकांना दिलासा

By जितेंद्र दखने | Updated: April 26, 2023 17:28 IST

जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थी

अमरावती : जिल्ह्यातील लाभार्थ्याना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या जत्रा शासकीय योजनांची... सर्वसामान्यांच्या विकासाची' या अभियानात जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार आहे.

राज्य शासनाकडून जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये जाणे, योजनांची माहिती घेणे आवश्यक कागदपत्रे विविध कार्यालयात जाऊन जमा करणे अधिकामे करावी लागतात. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालय वेगवेगळे ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कित्येक वेळा लोकांना शासनाच्या बऱ्याच योजनांची माहिती नसते. माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचू शकत नाही. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्याना मिळावा या उद्देशाने राज्य शासनाकडून काही निवडक ताुलक्यात मध्ये जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांचे विकासाची हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध जवळपास १७ योजनांचा लाभ कमीत कमी कालावधी देण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणार आहेत.

अंमलबजावणीसाठी नियोजन.....

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवण्याच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवण्यात आले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना दिल्या आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात आले. त्यानुषंगाने विविध स्तरांवरील जबाबदाऱ्यांचे सोपवून योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून अर्ज भरून घेणे ते लाभार्थ्यांची निवड आणि प्रत्यक्ष लाभ देणे इथपर्यत जबाबदारी निश्चित केलेली आहे.

शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यात शासकीय योजनांचा जत्रा आयोजित करण्यात येत आहे. ही जत्रा यशस्वी करण्यासाठी झेडपी व महसुल यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण,आरोग्य,समाजकल्याण व अन्य विभागाचे प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. या अभियानाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा.

- अविश्यांत पंडा, सीईओ जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार