शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शासकीय योजनांची जत्रा... लाभ मिळणार सतरा, नागरिकांना दिलासा

By जितेंद्र दखने | Updated: April 26, 2023 17:28 IST

जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थी

अमरावती : जिल्ह्यातील लाभार्थ्याना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या जत्रा शासकीय योजनांची... सर्वसामान्यांच्या विकासाची' या अभियानात जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार आहे.

राज्य शासनाकडून जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये जाणे, योजनांची माहिती घेणे आवश्यक कागदपत्रे विविध कार्यालयात जाऊन जमा करणे अधिकामे करावी लागतात. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालय वेगवेगळे ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कित्येक वेळा लोकांना शासनाच्या बऱ्याच योजनांची माहिती नसते. माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचू शकत नाही. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्याना मिळावा या उद्देशाने राज्य शासनाकडून काही निवडक ताुलक्यात मध्ये जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांचे विकासाची हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध जवळपास १७ योजनांचा लाभ कमीत कमी कालावधी देण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणार आहेत.

अंमलबजावणीसाठी नियोजन.....

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवण्याच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवण्यात आले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना दिल्या आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात आले. त्यानुषंगाने विविध स्तरांवरील जबाबदाऱ्यांचे सोपवून योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून अर्ज भरून घेणे ते लाभार्थ्यांची निवड आणि प्रत्यक्ष लाभ देणे इथपर्यत जबाबदारी निश्चित केलेली आहे.

शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यात शासकीय योजनांचा जत्रा आयोजित करण्यात येत आहे. ही जत्रा यशस्वी करण्यासाठी झेडपी व महसुल यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण,आरोग्य,समाजकल्याण व अन्य विभागाचे प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. या अभियानाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा.

- अविश्यांत पंडा, सीईओ जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार