शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

फडणवीसांचे विधान बेजबाबदारपणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:01 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ नोव्हेंबरला अमरावतीत जे घडले तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता. आता याचे राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवी आहे आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत. मात्र, त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असे दिसत आहे. या दोन्ही घटना तितक्याच दुर्देवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे. इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचाही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे, असे ना. यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचे स्वागत केले आहे. पण, अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचे आवाहन केले असते तर बरे झाले असते. मात्र, त्यांनी या घटनेवरून राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे, हे मान्य केले. मात्र, याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफीही त्यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री ठाकूर यांनी केली. 

दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेली. कोणालाच सोडणार नाही, ही सरकारची भूमिका आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत असल्याची टीका त्यांनी केली. रझा अकादमीचे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाईबाबत गृहविभाग कारवाई करत आहे. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसेच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर