शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

फडणवीसांचे विधान बेजबाबदारपणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:01 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ नोव्हेंबरला अमरावतीत जे घडले तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता. आता याचे राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवी आहे आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत. मात्र, त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असे दिसत आहे. या दोन्ही घटना तितक्याच दुर्देवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे. इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचाही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे, असे ना. यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचे स्वागत केले आहे. पण, अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचे आवाहन केले असते तर बरे झाले असते. मात्र, त्यांनी या घटनेवरून राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे, हे मान्य केले. मात्र, याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफीही त्यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री ठाकूर यांनी केली. 

दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेली. कोणालाच सोडणार नाही, ही सरकारची भूमिका आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत असल्याची टीका त्यांनी केली. रझा अकादमीचे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाईबाबत गृहविभाग कारवाई करत आहे. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसेच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर