शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचे विधान बेजबाबदारपणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:01 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ नोव्हेंबरला अमरावतीत जे घडले तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता. आता याचे राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवी आहे आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत. मात्र, त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असे दिसत आहे. या दोन्ही घटना तितक्याच दुर्देवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे. इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचाही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे, असे ना. यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचे स्वागत केले आहे. पण, अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचे आवाहन केले असते तर बरे झाले असते. मात्र, त्यांनी या घटनेवरून राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे, हे मान्य केले. मात्र, याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफीही त्यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री ठाकूर यांनी केली. 

दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेली. कोणालाच सोडणार नाही, ही सरकारची भूमिका आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत असल्याची टीका त्यांनी केली. रझा अकादमीचे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाईबाबत गृहविभाग कारवाई करत आहे. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसेच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर