शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मार्च एडिंग तोंडावर, अखर्चित निधी खर्चाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त झालेला ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त झालेला निधी येत्या ३१ मार्चपूर्वी खर्च करावा कुठलाही निधी अखर्चित राहू नये याकरिता सर्व विभागाच्या खात्याप्रमुखांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी २ फेब्रुवारी रोजी काढलेल्या पत्राव्दारे दिले आहेत.

दरवर्षी आर्थिक वर्षात शासनाकडून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागाना कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा परिषदेला प्राप्त होणारा निधी खर्चाला दोन वर्षाची मर्यादा आहे. त्यानुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील उपलब्ध झालेला विकास कामांसह योजनांचा निधी हा येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च करता येणार आहे. त्यानंतर हा निधी खर्च करता येणार नसल्याने जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व विभागांनी आपआपल्या विभागाला उपलब्ध असलेल्या विकासनिधीचे नियोजनाप्रमाणे मुदतीत खर्च करावा, कुठलाही निधी व्यपगत होणार नाही. याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना या पत्राव्दारे जिल्हा परिषदेच्या बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, सिंचन, पंचायत, पशुसंर्वधन अशा सर्वच विभागाला लेखी पत्राव्दारे कळविले. विशेष म्हणजे ज्या विभागाकडे निधी अखर्चित राहिल्यास त्यांची जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची राहील याची जाणीव मुख्यलेखा व वित्त अधिकारी यांनी पत्राव्दारे करून दिली आहे.

कोट

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना शासन व जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने खातेप्रमुख यांनी याबाबत दक्षता घ्यावी.

- चंद्रशेखर खंडारे,

मुख्यलेखा व वित्त अधिकारी

जिल्हा परिषद