शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कंत्राटाचा तिढा स्वच्छतेच्या मुळावर

By admin | Updated: June 28, 2017 00:20 IST

दैनंदिन स्वच्छता कंत्राटाचे राजकारण होत असल्याने शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. एकंदरित कंत्राटाचा तिढा स्वच्छतेच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे.

पद्धती ठरेना : राजकीय विसंवादलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दैनंदिन स्वच्छता कंत्राटाचे राजकारण होत असल्याने शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. एकंदरित कंत्राटाचा तिढा स्वच्छतेच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. स्थायी समिती मल्टिनॅशनल कंपनीसाठी आग्रही असली तरी प्रशासनाने मात्र ‘आहिस्ता कदम’ची भूमिका घेतली आहे. मल्टिनॅशनल कंपनीच्या कंत्राटावर सर्वपक्षीय शिक्कामोर्तब न झाल्याने हा तिढा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. आता आपल्या वाट्याला स्वच्छतेचा कंत्राट येणार नाही, या मानसिकतेने विद्यमान कंत्राटदारांना ग्रासले असून त्यांनी स्वच्छतेबाबत हात आवरता घेतला आहे.अनेक वर्षांपासून दैनंदिन स्वच्छता प्रभागनिहाय पद्धतीने होत आहे. ४३ प्रभागांत ४३ कंत्राटदार त्यासाठी नेमले आहेत. कंत्राटदारांच्या कामगारांसह महापालिका आस्थापनेवरील कामगार दैनंदिन स्वच्छता करू लागले. निवडणुकीपूर्वी त्या कंत्राटदारांना मुदतवाढही देण्यात आली. मात्र सत्ताधीश म्हणून भाजप विराजमान झाल्यानंतर प्रभागनिहाय कंत्राट पद्धत गैरलागू ठरविण्यात आली. विरोध पत्करून स्थायी सभापती तुषार भारतीय यांनी ‘मल्टिनॅशनल’ कंपनीचा ठराव पारित करून घेतला. मात्र दीड-दोन महिन्यानंतरही या मल्टिनॅशनल ठरावाला मूर्तरूप आलेले नाही. अद्यापपर्यंत अटी-शर्ती ठरलेल्या नाही. दुसरीकडे दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पद्धती न अवलंबविता एकाच बड्या कंपनीकडे हे कंत्राट जात असल्याने सद्याचे कंत्राटदार निश्चित झाले. कंत्राट संपलेला आहेच, केवळ मुदतवाढ मिळाल्याने कसेतरी काम करायचे, अल्प कामगार लावून स्वच्छता उरकायची, असा पवित्रा या विद्यमान कंत्राटदारांनी घेतल्याने शहरात सर्वदूर अस्वच्छतेचा कहर झाला आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील एकवाक्यता नसल्याने व स्वच्छता कंत्राटाची निविदा प्रक्रिया रखडल्याने कंत्राटदारांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. जोपर्यंत नव्याने निविदा निघत नाहीत तोपर्यंत दैनंदिन स्वच्छता करण्यास आपण बांधील आहात, असे आयुक्तांनी बजावले होते. मात्र त्याचाही परिणाम कंत्राटदारांवर झालेला नाही. शहरातील अन्य ठिकाणांच्या तुलनेत इतवारा बाजाराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. संबंधित कंत्राटदाराला अभय का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.प्रशासनाचा सावध पवित्राप्रभागनिहाय पद्धती की मल्टिनॅशनल कंपनी याबाबत महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. तुषार भारतीय हे एका मल्टिनॅशनल कंपनीसाठी आग्रही असले तरी प्रशासनाला विरोधाचीही कल्पना आहे. त्यामुळे प्रशासन स्थायीच्या बैठकीत अटी-शर्ती तर ठेवेल. मात्र निविदा प्रक्रियेला सुरूवात करणार नाही, असे संकेत आहेत.