शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:47 IST

शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे.

ठळक मुद्देतहानलेल्या गावांना दिलासा : निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ १२ टक्के साठा आहे. वर्धा नदी प्रवाहित नसल्यामुळे काठालगतच्या गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे टँकर व खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे या गावांची तहान भागविली जायची. मात्र, पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी शासनाने दिलेली १५ जुलैची मुदत संपल्याने या गावात बिकट समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’द्वारा या ही समस्या जनदरबारात मांडली असता, जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरच्या अधिकारांचा वापर करीत या सर्व उपाययोजनांना आता ३१ जुलैपर्य$ंत मुदतवाढ दिलेली आहे.जिल्ह्यात मुदतीच्या आत ५४ टँकर व ३५४ खासगी अधिग्रहणातील विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडून पाणीपुरवठ्याच्या तात्पुरत्या काही योजना सुरू होत्या. त्यालाही आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.२३ लघुप्रकल्पात शून्य टक्के साठाजिल्ह्यात ४६ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ९७.९८ प्रकल्पीय संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत ६.८६ टक्केच साठा आहे. सूर्यगंगा, दहिगाव धानोरा, मालेगाव, खतिजापूर,, गोंडवाघोली, गोंडविहीर,मालखेड, बासलापूर, सरस्वती, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, त्रिवेणी, शेकदरी, पंढरी, सातनूर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, जमालपूर, पुसली या २३ प्रकल्पात शून्य जलसाठा आहे.जिल्ह्यात पावसाची तूट आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकारान्वये ३१ जुलैपर्यत पाणीटंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे.- नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी