शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:47 IST

शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे.

ठळक मुद्देतहानलेल्या गावांना दिलासा : निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ १२ टक्के साठा आहे. वर्धा नदी प्रवाहित नसल्यामुळे काठालगतच्या गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे टँकर व खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे या गावांची तहान भागविली जायची. मात्र, पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी शासनाने दिलेली १५ जुलैची मुदत संपल्याने या गावात बिकट समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’द्वारा या ही समस्या जनदरबारात मांडली असता, जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरच्या अधिकारांचा वापर करीत या सर्व उपाययोजनांना आता ३१ जुलैपर्य$ंत मुदतवाढ दिलेली आहे.जिल्ह्यात मुदतीच्या आत ५४ टँकर व ३५४ खासगी अधिग्रहणातील विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडून पाणीपुरवठ्याच्या तात्पुरत्या काही योजना सुरू होत्या. त्यालाही आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.२३ लघुप्रकल्पात शून्य टक्के साठाजिल्ह्यात ४६ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ९७.९८ प्रकल्पीय संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत ६.८६ टक्केच साठा आहे. सूर्यगंगा, दहिगाव धानोरा, मालेगाव, खतिजापूर,, गोंडवाघोली, गोंडविहीर,मालखेड, बासलापूर, सरस्वती, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, त्रिवेणी, शेकदरी, पंढरी, सातनूर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, जमालपूर, पुसली या २३ प्रकल्पात शून्य जलसाठा आहे.जिल्ह्यात पावसाची तूट आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकारान्वये ३१ जुलैपर्यत पाणीटंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे.- नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी