शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पाणीटंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:47 IST

शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे.

ठळक मुद्देतहानलेल्या गावांना दिलासा : निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपल्यानंतर तहानलेल्या ३०० हून अधिक गावांतील पाणीटंचाईच्या उपाययोजनांची ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.जिल्ह्यात पावसाची सद्यस्थितीत १३२ मिमी म्हणजेच ४६ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठ्याचे उद्भव असलेले जलस्रोत कोरडे आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने लघुप्रकल्पात अद्यापही मृत साठाच आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ १२ टक्के साठा आहे. वर्धा नदी प्रवाहित नसल्यामुळे काठालगतच्या गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे टँकर व खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे या गावांची तहान भागविली जायची. मात्र, पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी शासनाने दिलेली १५ जुलैची मुदत संपल्याने या गावात बिकट समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’द्वारा या ही समस्या जनदरबारात मांडली असता, जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरच्या अधिकारांचा वापर करीत या सर्व उपाययोजनांना आता ३१ जुलैपर्य$ंत मुदतवाढ दिलेली आहे.जिल्ह्यात मुदतीच्या आत ५४ टँकर व ३५४ खासगी अधिग्रहणातील विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडून पाणीपुरवठ्याच्या तात्पुरत्या काही योजना सुरू होत्या. त्यालाही आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.२३ लघुप्रकल्पात शून्य टक्के साठाजिल्ह्यात ४६ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ९७.९८ प्रकल्पीय संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत ६.८६ टक्केच साठा आहे. सूर्यगंगा, दहिगाव धानोरा, मालेगाव, खतिजापूर,, गोंडवाघोली, गोंडविहीर,मालखेड, बासलापूर, सरस्वती, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, त्रिवेणी, शेकदरी, पंढरी, सातनूर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, जमालपूर, पुसली या २३ प्रकल्पात शून्य जलसाठा आहे.जिल्ह्यात पावसाची तूट आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकारान्वये ३१ जुलैपर्यत पाणीटंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे.- नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी