शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गावतलाव कॅनलच्या वेस्ट वेअरने भरण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:02 IST

शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करून अचलपूर तालुक्यातील ३०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी कॅनलचे वाया जाणारे पाणी तलावात सोडण्याचा अभिनव प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयोग आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने होणार आहे.

ठळक मुद्देबच्चू कडूंचे प्रयत्न : तीनशे हेक्टर शेतजमीन ओलिताखाली घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करून अचलपूर तालुक्यातील ३०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी कॅनलचे वाया जाणारे पाणी तलावात सोडण्याचा अभिनव प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयोग आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने होणार आहे. त्यांनी शनिवारी पहाटे ५.३० पासून परिसरातील गावांचा दौरा केला.अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, चमक, सुरवाडा, खोजनपूर आदी गावांचा दौरा आ. बच्चू कडू यांनी शनिवारी केला. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंता एस.पी. कुलकर्णी, चंद्रभागा प्रकल्पाचे रूपेश मोहिते, एन.डी. वानखडे, ओंकार पाटील, प्रहारचे अंकुश जवंजाळ, दीपक धुळधर, मंगेश हूड, संजय तट्टे, उपसभापती सोनाली तट्टे आदी उपस्थित होते.कॅनलचे पाणी तलावात सोडणारचंद्रभागा प्रकल्पावरील कॅनलमधील पाणी वाया न जाऊ देता, ते या गावातील तलावात सोडण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. पावसाळा संपताच कोरड्या पडणाऱ्या तलावांना या प्रयोगाने पुनर्जीवन मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून योग्य पर्याय काढण्याच्या सूचना आ. बच्चू कडू यांनी दिल्या. तलावातील पाण्यातून गावातील पिण्याच्या पाण्यासह परिसरातील विहिरी, बोअरवेलची पातळी वाढण्याचा प्रयोग यातून केला जाणार आहे.