शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

प्रक्रिया प्रकल्पाविना ‘प्लास्टिक’चा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:19 IST

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत असताना प्रतिबंधित प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला मर्यादा आल्याने शहरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन घनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिक असून, पालिकेला आहे त्या प्रकल्पाला अधिक क्षमतेने चालविण्याची निकड आहे.

ठळक मुद्देघनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिकच : शासन निर्देशाची अंमलबजावणी केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत असताना प्रतिबंधित प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला मर्यादा आल्याने शहरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन घनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिक असून, पालिकेला आहे त्या प्रकल्पाला अधिक क्षमतेने चालविण्याची निकड आहे.राज्यात २३ जूनपासून संपूर्ण प्लास्टिकबंदी लागू झाली. त्यानंतर प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यासह विक्रेत्यांवरही बडगा उगारण्यात आला. त्यामुळे अनेकांनी कारवाई नको म्हणून घरातील प्लास्टिक उघड्यावर फेकले. याखेरीज थर्माकॉल व डिस्पोजल वस्तूही कचºयात फेकण्यात आल्या. परिणामी रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचा खच दिसून येत आहे. सुकळी येथील प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट बंद असल्यातच जमा असल्याने शहरातून निघणारे प्लास्टिक ‘जैसे थे’ सुकळी कंपोस्ट डेपोत रिचविले जाते.प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला असला तरी काही व्यापारी व दुकानदार चोरून प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर करीत आहेत, तर बहुतांश जण निर्जन स्थळी प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल आणून टाकत असल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.राज्य सरकारचे शपथपत्रउच्च न्यायालयाने सर्व महापालिका आणि नगर परिषदांना प्लास्टिक जमा करण्यासाठी, त्याची वाहतूक करून प्रक्रियेच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. त्याबाबत निर्देश नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे.प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटला मर्यादा२ आॅक्टोबर २०१६ रोजी सुकळी कंपोस्ट डेपोत प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट कार्यान्वित करण्यात आले. मात्र, दीड वर्षानंतरही या प्रकल्पाची वेगवान अंमलबजावणी झालेली नाही. दोन दिवस सुरू आणि चार दिवस बंद अशी या प्रकल्पाची अवस्था आहे.प्लास्टिक कचऱ्यात मोठी वाढ झाल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या तुलनेत महापालिकेजवळची साधनसामग्री अल्प आहे.- नरेंद्र वानखडेउपायुक्त (सामान्य)