शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

नगरपंचायतीमुळे वाढल्या भातकुलीवासीयांच्या अपेक्षा

By admin | Updated: February 13, 2016 00:09 IST

भातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत.

जैनांच्या काशीत अनेक समस्या : बसस्थानकावर प्रसाधनगृह व्हावेकिशोर लेंडे भातकुलीभातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत. त्यातल्या त्यात स्थानिक बसस्थानकात प्रसाधनगृह व्हावे, अशी महिलांची मागणी आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी यांसह इतर मागण्यांकडे लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, घनकचऱ्याची विल्हेवाट, हिंदू स्मशानभूमिचे सौंदर्यीकरण, पथदिवे, बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. ते अरूंद झाले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण काढल्यास रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील तसेच शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असे सामान्य जनतेचे म्हणणे आहे. तालुकास्तरीय ग्रांपचे रूपांतरण नगरपंचायतीत झाल्याने आता शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. आता विकासाकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या नगर विकासाचा निधी मिळत असल्याने मुलभूत सुविधांसह इतर अनेक विकासात्मक कामे करणे शक्य होणार आहे. मात्र, ती करताना कृती विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तेव्हाच शहराचा नियोजनबध्द विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत भातकुली शहरातील प्रमुख रस्ते उखडले आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नाहीत. या नाल्या बांधल्यास सांडपाण्याची विल्हेवाट पध्दतशिरपणे लावता येईल. लहान मुलांसाठी एखादे उद्यानही साकारले जावे, असे येथील जनतेचे म्हणणे आहे. येथील बसस्थानकावर प्रसाधनगृह नसल्याने प्रवाशांचे, विशेषत: महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होते. जैनांचे तीर्थस्थळ उपेक्षितचतालुक्याचे ठिकाण व जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या भातकुली शहराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाला. शहराला पौराणिक इतिहास आहे. त्यामुळे या शहराला तीर्थक्षेत्र विकास निधी देखील मिळणार आहे. यातून बसस्थानकावर आवश्यक सोयी पुरविण्यात याव्यात तसेच इतरही समस्या मार्गी लावाव्यात, अशी जनतेची मागणी आहे.