शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीमुळे वाढल्या भातकुलीवासीयांच्या अपेक्षा

By admin | Updated: February 13, 2016 00:09 IST

भातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत.

जैनांच्या काशीत अनेक समस्या : बसस्थानकावर प्रसाधनगृह व्हावेकिशोर लेंडे भातकुलीभातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत. त्यातल्या त्यात स्थानिक बसस्थानकात प्रसाधनगृह व्हावे, अशी महिलांची मागणी आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी यांसह इतर मागण्यांकडे लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, घनकचऱ्याची विल्हेवाट, हिंदू स्मशानभूमिचे सौंदर्यीकरण, पथदिवे, बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. ते अरूंद झाले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण काढल्यास रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील तसेच शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असे सामान्य जनतेचे म्हणणे आहे. तालुकास्तरीय ग्रांपचे रूपांतरण नगरपंचायतीत झाल्याने आता शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. आता विकासाकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या नगर विकासाचा निधी मिळत असल्याने मुलभूत सुविधांसह इतर अनेक विकासात्मक कामे करणे शक्य होणार आहे. मात्र, ती करताना कृती विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तेव्हाच शहराचा नियोजनबध्द विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत भातकुली शहरातील प्रमुख रस्ते उखडले आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नाहीत. या नाल्या बांधल्यास सांडपाण्याची विल्हेवाट पध्दतशिरपणे लावता येईल. लहान मुलांसाठी एखादे उद्यानही साकारले जावे, असे येथील जनतेचे म्हणणे आहे. येथील बसस्थानकावर प्रसाधनगृह नसल्याने प्रवाशांचे, विशेषत: महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होते. जैनांचे तीर्थस्थळ उपेक्षितचतालुक्याचे ठिकाण व जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या भातकुली शहराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाला. शहराला पौराणिक इतिहास आहे. त्यामुळे या शहराला तीर्थक्षेत्र विकास निधी देखील मिळणार आहे. यातून बसस्थानकावर आवश्यक सोयी पुरविण्यात याव्यात तसेच इतरही समस्या मार्गी लावाव्यात, अशी जनतेची मागणी आहे.