शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीमुळे वाढल्या भातकुलीवासीयांच्या अपेक्षा

By admin | Updated: February 13, 2016 00:09 IST

भातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत.

जैनांच्या काशीत अनेक समस्या : बसस्थानकावर प्रसाधनगृह व्हावेकिशोर लेंडे भातकुलीभातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत. त्यातल्या त्यात स्थानिक बसस्थानकात प्रसाधनगृह व्हावे, अशी महिलांची मागणी आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी यांसह इतर मागण्यांकडे लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, घनकचऱ्याची विल्हेवाट, हिंदू स्मशानभूमिचे सौंदर्यीकरण, पथदिवे, बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. ते अरूंद झाले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण काढल्यास रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील तसेच शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असे सामान्य जनतेचे म्हणणे आहे. तालुकास्तरीय ग्रांपचे रूपांतरण नगरपंचायतीत झाल्याने आता शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. आता विकासाकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या नगर विकासाचा निधी मिळत असल्याने मुलभूत सुविधांसह इतर अनेक विकासात्मक कामे करणे शक्य होणार आहे. मात्र, ती करताना कृती विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तेव्हाच शहराचा नियोजनबध्द विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत भातकुली शहरातील प्रमुख रस्ते उखडले आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नाहीत. या नाल्या बांधल्यास सांडपाण्याची विल्हेवाट पध्दतशिरपणे लावता येईल. लहान मुलांसाठी एखादे उद्यानही साकारले जावे, असे येथील जनतेचे म्हणणे आहे. येथील बसस्थानकावर प्रसाधनगृह नसल्याने प्रवाशांचे, विशेषत: महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होते. जैनांचे तीर्थस्थळ उपेक्षितचतालुक्याचे ठिकाण व जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या भातकुली शहराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाला. शहराला पौराणिक इतिहास आहे. त्यामुळे या शहराला तीर्थक्षेत्र विकास निधी देखील मिळणार आहे. यातून बसस्थानकावर आवश्यक सोयी पुरविण्यात याव्यात तसेच इतरही समस्या मार्गी लावाव्यात, अशी जनतेची मागणी आहे.