शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

अपेक्षा १०० कोटींची, मिळणार अत्यल्प

By admin | Updated: March 20, 2015 00:22 IST

शासनाकडे सातत्त्याने निधीसाठी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. राज्यात १५ वर्षांच्या तपानंतर भाजप, सेना युतीचे शासन आल्यानंतर विदर्भावर अन्याय होणार नाही,

अमरावती : शासनाकडे सातत्त्याने निधीसाठी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. राज्यात १५ वर्षांच्या तपानंतर भाजप, सेना युतीचे शासन आल्यानंतर विदर्भावर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, युती शासनाच्या पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्याला फार काही मिळाले नाही, अशी सर्वसामान्यांची ओरड आहे. रखडलेले प्रकल्प किंवा खुंटलेल्या विकास कामांना भरभरुन निधी मिळेल, ही आशा आमदारांना होती. परंतु तसे काही झाले नाही. बेलोरा विमानतळाच्या विकासात निधीची अडसर दूर होईल, असे बजेट पुर्वी दिसून येत होते. मात्र बेलोरा विमानतळाचे सौदर्यीकरण, विस्तारीकरणासाठी फार काही निधी मिळाला नाही. ज्या काही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून यवतमाळ वळण मार्गाचे काम पूर्ण होईल, असे चित्र आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल, पायाभूत सुविधा, सौदयीकरण आदी विकास कामांना निधीअभावी ब्रेक लागला आहे. बेलोरा विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे ३०० कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला आहे. चार महिन्यापुर्वीच विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बेलोरा विमानतळाची पाहणी करुन आवश्यक सुविधांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. अर्थसंकल्पात किमान बेलोरा विमानतळाचा विस्तार, सौंदर्यीकरणासाठी १०० कोटींची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले आहे. विमानतळाच्या विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पुढील वर्षांपर्यत प्रतीक्षा करावी लागणार, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)