शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अपेक्षा १०० कोटींची, मिळणार अत्यल्प

By admin | Updated: March 20, 2015 00:22 IST

शासनाकडे सातत्त्याने निधीसाठी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. राज्यात १५ वर्षांच्या तपानंतर भाजप, सेना युतीचे शासन आल्यानंतर विदर्भावर अन्याय होणार नाही,

अमरावती : शासनाकडे सातत्त्याने निधीसाठी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. राज्यात १५ वर्षांच्या तपानंतर भाजप, सेना युतीचे शासन आल्यानंतर विदर्भावर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, युती शासनाच्या पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्याला फार काही मिळाले नाही, अशी सर्वसामान्यांची ओरड आहे. रखडलेले प्रकल्प किंवा खुंटलेल्या विकास कामांना भरभरुन निधी मिळेल, ही आशा आमदारांना होती. परंतु तसे काही झाले नाही. बेलोरा विमानतळाच्या विकासात निधीची अडसर दूर होईल, असे बजेट पुर्वी दिसून येत होते. मात्र बेलोरा विमानतळाचे सौदर्यीकरण, विस्तारीकरणासाठी फार काही निधी मिळाला नाही. ज्या काही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून यवतमाळ वळण मार्गाचे काम पूर्ण होईल, असे चित्र आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल, पायाभूत सुविधा, सौदयीकरण आदी विकास कामांना निधीअभावी ब्रेक लागला आहे. बेलोरा विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे ३०० कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला आहे. चार महिन्यापुर्वीच विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बेलोरा विमानतळाची पाहणी करुन आवश्यक सुविधांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. अर्थसंकल्पात किमान बेलोरा विमानतळाचा विस्तार, सौंदर्यीकरणासाठी १०० कोटींची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले आहे. विमानतळाच्या विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पुढील वर्षांपर्यत प्रतीक्षा करावी लागणार, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)