शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: December 31, 2015 00:16 IST

कृषी पंपाच्या वीज जोडणीची थकीत देयके अदा करण्यासाठी महावितरण द्वारा कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली होती.

३१ मार्च मुदत : कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावरील व्याज, दंड माफ अमरावती : कृषी पंपाच्या वीज जोडणीची थकीत देयके अदा करण्यासाठी महावितरण द्वारा कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महावितरणच्या कृषी ग्राहकांना मुदत करण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडील वीज देयकांच्या थकीत रकमेचा भार कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी संजीवनी योजना -२०१४ राबविण्यात आली. सुरुवातीला ही योजना ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस ३१ आॅक्टोंबर २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली. आता या योजनेला ३१ मार्च २०१६ मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात हजारों शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत असून या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेला मुदतवाढीमुळे योजनेसाठी पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांना ३१ मार्च २०१४ च्या मुळ थकबाकी रकमेच्या ५० टक्के मुळ थकीत रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के मुळ थकीत रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान स्वरुपात माफ करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१४ नंतर वितरित करण्यात आलेल्या चालू वीज देयकांचा भरणा करणे योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्रहकांना क्रमप्राप्त आहे. कृषी ग्राहकांना वीज बिल करण्यासंबंधी सुलभ हफ्ते आवश्यक असल्यास ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६ अखेर सर्व रक्कम वसूल होईल अश्या रितीने समान हप्ते पाडून देण्यात येणार आहे. सदर कृषी संजीवनी योजना २०१४ ही तात्पुरत्या व कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या कृषी ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना सुद्धा लागू राहणार आहे. त्या कृषि ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही. अथवा योजने अंतर्गत ठरविण्यात आलेल्या रकमेच्या भरणा केला नाही. अश्या कृषी ग्राहकांना योजनेकरीता अपात्र ठरविण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम पुनश्च ग्राहकांच्या खात्यात दर्शविली जाणार आहे. व विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसूलीकरिता नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खंडित झालेल्या कृषीपंपाच्या जोडण्या पूर्ववत करता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)