शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: December 31, 2015 00:16 IST

कृषी पंपाच्या वीज जोडणीची थकीत देयके अदा करण्यासाठी महावितरण द्वारा कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली होती.

३१ मार्च मुदत : कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावरील व्याज, दंड माफ अमरावती : कृषी पंपाच्या वीज जोडणीची थकीत देयके अदा करण्यासाठी महावितरण द्वारा कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महावितरणच्या कृषी ग्राहकांना मुदत करण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडील वीज देयकांच्या थकीत रकमेचा भार कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी संजीवनी योजना -२०१४ राबविण्यात आली. सुरुवातीला ही योजना ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस ३१ आॅक्टोंबर २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली. आता या योजनेला ३१ मार्च २०१६ मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात हजारों शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत असून या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेला मुदतवाढीमुळे योजनेसाठी पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांना ३१ मार्च २०१४ च्या मुळ थकबाकी रकमेच्या ५० टक्के मुळ थकीत रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के मुळ थकीत रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान स्वरुपात माफ करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१४ नंतर वितरित करण्यात आलेल्या चालू वीज देयकांचा भरणा करणे योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्रहकांना क्रमप्राप्त आहे. कृषी ग्राहकांना वीज बिल करण्यासंबंधी सुलभ हफ्ते आवश्यक असल्यास ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६ अखेर सर्व रक्कम वसूल होईल अश्या रितीने समान हप्ते पाडून देण्यात येणार आहे. सदर कृषी संजीवनी योजना २०१४ ही तात्पुरत्या व कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या कृषी ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना सुद्धा लागू राहणार आहे. त्या कृषि ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही. अथवा योजने अंतर्गत ठरविण्यात आलेल्या रकमेच्या भरणा केला नाही. अश्या कृषी ग्राहकांना योजनेकरीता अपात्र ठरविण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम पुनश्च ग्राहकांच्या खात्यात दर्शविली जाणार आहे. व विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसूलीकरिता नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खंडित झालेल्या कृषीपंपाच्या जोडण्या पूर्ववत करता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)