शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:55 IST

शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आहे. हल्ली हिवाळी परीक्षेसाठी या निर्णयाचा लाभ मिळणार नसला तरी उन्हाळी परीक्षा- २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे संकेत आहेत.

ठळक मुद्देमहाविद्यालयात प्रवेशितांना लाभ : विद्यापीठांतर्गत राबविणार उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आहे. हल्ली हिवाळी परीक्षेसाठी या निर्णयाचा लाभ मिळणार नसला तरी उन्हाळी परीक्षा- २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे संकेत आहेत.अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ, परीक्षा मंडळांची फी माफ केली जाणार आहे. यामध्ये अकृषी विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा समावेश असणार आहे. महसूल व वन विभागाने राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केलेल्या १८० तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफीसंबंधीची कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नव्या शासननिर्णयात २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. अमरावती विभागातील २८ तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच ४७ महसुली मंडळातील समाविष्ट विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.प्राचार्यांशी पत्रव्यवहारदुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत विद्यापीठाकडून प्राचार्यांना पत्रव्यवहार करण्यात येत आहे. शसनाने जाहीर केलेल्या तालुक्यातील महाविद्यालीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अहवालदेखील पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, अशा सूचना प्राचार्यांना दिल्या आहेत. त्याकरिता परीक्षा विभाग सतर्क आहे.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ