शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:55 IST

शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आहे. हल्ली हिवाळी परीक्षेसाठी या निर्णयाचा लाभ मिळणार नसला तरी उन्हाळी परीक्षा- २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे संकेत आहेत.

ठळक मुद्देमहाविद्यालयात प्रवेशितांना लाभ : विद्यापीठांतर्गत राबविणार उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आहे. हल्ली हिवाळी परीक्षेसाठी या निर्णयाचा लाभ मिळणार नसला तरी उन्हाळी परीक्षा- २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे संकेत आहेत.अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ, परीक्षा मंडळांची फी माफ केली जाणार आहे. यामध्ये अकृषी विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा समावेश असणार आहे. महसूल व वन विभागाने राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केलेल्या १८० तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफीसंबंधीची कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नव्या शासननिर्णयात २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. अमरावती विभागातील २८ तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच ४७ महसुली मंडळातील समाविष्ट विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.प्राचार्यांशी पत्रव्यवहारदुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत विद्यापीठाकडून प्राचार्यांना पत्रव्यवहार करण्यात येत आहे. शसनाने जाहीर केलेल्या तालुक्यातील महाविद्यालीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अहवालदेखील पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, अशा सूचना प्राचार्यांना दिल्या आहेत. त्याकरिता परीक्षा विभाग सतर्क आहे.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ