शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागल्यावर खोदणार विहीर

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.

पाणी टंचाईच्या झळा : ७०८ गावांत होणार ७३६ उपाययोजना गजानन मोहोड अमरावती यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकाही गावात उपाययोजना केलेली नाही. ‘येरे माझ्या मागल्या’ हे सुरूच आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ‘तहान लागल्यावर विहीर खोदणार आहे.’ यामध्ये जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित आहे. यासाठी १० कोटी ९१ लाख ९० हजाराचा निधी खर्च करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या १२० दिवसात जिल्ह्यात किमान ७२१ मि. मी. पावसाची सरासरी अपेक्षीत असताना एकूण ८९ टक्के पाऊस पडला, यामध्ये केवळ तिवसा व अंजनगाव सुर्जी या तालुक्यांनी पावसाची सरासरी गाठली, उर्वरित १२ तालुक्यात सरासरी इतपतही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरीपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. अपुऱ्या पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार हे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या काळात जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आलेले नाही. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत १०४ गावांतील नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ९१ लाख ६९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १७७ विंधन विहिरी करणार अमरावती : या टप्प्यात ३७ तात्पुरत्या नळयोजना घेण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ६६ लाख ५० हजाराचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच १७७ नवीन विंधन विहीरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. तसेच ९३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे व ६ ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १० लाख २० हजाराचा निधी असा एकूण दुसऱ्या टप्प्यात ६ कोटी ६७ लाख ९७ हजाराचा निधी जिल्ह्यात खर्च केल्या जाणार आहे.