शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

तहान लागल्यावर खोदणार विहीर

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.

पाणी टंचाईच्या झळा : ७०८ गावांत होणार ७३६ उपाययोजना गजानन मोहोड अमरावती यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकाही गावात उपाययोजना केलेली नाही. ‘येरे माझ्या मागल्या’ हे सुरूच आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ‘तहान लागल्यावर विहीर खोदणार आहे.’ यामध्ये जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित आहे. यासाठी १० कोटी ९१ लाख ९० हजाराचा निधी खर्च करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या १२० दिवसात जिल्ह्यात किमान ७२१ मि. मी. पावसाची सरासरी अपेक्षीत असताना एकूण ८९ टक्के पाऊस पडला, यामध्ये केवळ तिवसा व अंजनगाव सुर्जी या तालुक्यांनी पावसाची सरासरी गाठली, उर्वरित १२ तालुक्यात सरासरी इतपतही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरीपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. अपुऱ्या पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार हे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या काळात जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आलेले नाही. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत १०४ गावांतील नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ९१ लाख ६९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १७७ विंधन विहिरी करणार अमरावती : या टप्प्यात ३७ तात्पुरत्या नळयोजना घेण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ६६ लाख ५० हजाराचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच १७७ नवीन विंधन विहीरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. तसेच ९३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे व ६ ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १० लाख २० हजाराचा निधी असा एकूण दुसऱ्या टप्प्यात ६ कोटी ६७ लाख ९७ हजाराचा निधी जिल्ह्यात खर्च केल्या जाणार आहे.