शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

तहान लागल्यावर खोदणार विहीर

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.

पाणी टंचाईच्या झळा : ७०८ गावांत होणार ७३६ उपाययोजना गजानन मोहोड अमरावती यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकाही गावात उपाययोजना केलेली नाही. ‘येरे माझ्या मागल्या’ हे सुरूच आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ‘तहान लागल्यावर विहीर खोदणार आहे.’ यामध्ये जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित आहे. यासाठी १० कोटी ९१ लाख ९० हजाराचा निधी खर्च करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या १२० दिवसात जिल्ह्यात किमान ७२१ मि. मी. पावसाची सरासरी अपेक्षीत असताना एकूण ८९ टक्के पाऊस पडला, यामध्ये केवळ तिवसा व अंजनगाव सुर्जी या तालुक्यांनी पावसाची सरासरी गाठली, उर्वरित १२ तालुक्यात सरासरी इतपतही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरीपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. अपुऱ्या पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार हे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या काळात जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आलेले नाही. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत १०४ गावांतील नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ९१ लाख ६९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १७७ विंधन विहिरी करणार अमरावती : या टप्प्यात ३७ तात्पुरत्या नळयोजना घेण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ६६ लाख ५० हजाराचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच १७७ नवीन विंधन विहीरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. तसेच ९३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे व ६ ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १० लाख २० हजाराचा निधी असा एकूण दुसऱ्या टप्प्यात ६ कोटी ६७ लाख ९७ हजाराचा निधी जिल्ह्यात खर्च केल्या जाणार आहे.