शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा तोंडावर; अभ्यासक्रम डोक्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST

चांदूर बाजार : कोरोनामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल व मे महिन्यात परीक्षा होणार आहेत. तीन ...

चांदूर बाजार : कोरोनामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल व मे महिन्यात परीक्षा होणार आहेत. तीन महिन्यांवर बारावी व दहावीची बोर्ड परीक्षा आली असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रही प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले, तर आता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले होते. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रमसुद्धा कमी करण्यात आला आहे. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. मात्र, यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे.

नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यापासून काही प्रमाणात खाजगी वर्ग सुरू झाल्याने दहा महिन्यांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण कसा होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आले. गणित व विज्ञान हे विषय ऑनलाइन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. यंदा कोरोनामुळे दहावी व बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला गेला आहे.

शिक्षक, विद्यार्थ्यांची कसरत

अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, शिक्षकांना नोव्हेंबर ते एप्रिल अशा सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच कसरत होणार आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑनलाइन शिक्षण प्रणाली नवीन असल्याने विद्यार्थ्यांना हे शिक्षण पचनी पडले नाही. या शिक्षणात पालकांचा खिशाला चांगलीच कात्री लागल्याने आपला पाल्य शिकत असल्याचे केवळ समाधान पालक वर्गातर्फे व्यक्त केले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षण अधिक सोपे जात असल्याने आता खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह पालक वर्ग व्यक्त करीत आहे. मात्र, १० महिन्यांत मिळणारे शिक्षण सहा महिन्यांत कसे पूर्ण करावे, अशी चिंतासुद्धा शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांना लागली आहे.

--------------