शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दररोज एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By admin | Updated: March 23, 2016 00:22 IST

यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८० प्रकल्पातील ....

जिल्ह्यात ८० प्रकल्प : एका आठवड्यात १४ दलघमीने पातळीत घटगजानन मोहोड अमरावतीयंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८० प्रकल्पातील जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. एका आठवड्यात या प्रकल्पांची सरासरी पातळी १४ दलघमीने कमी झाली आहे. प्रकल्पांमधून पाण्याचा जितका वापर होतो, त्याच्या सहापटीने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. उन्हाची दाहकता अशीच राहिल्यास लवकरच जलसाठा धोक्याची पातळी गाठण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. या व्यतिरीक्त शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सापन हे चार मध्यम व ७५ मध्यम प्रकल्प आहेत. १० मार्च रोजी यासर्व ८० प्रकल्पांत ८९२.७७ इतक्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत ३०९.६० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. ही टक्केवारी ३४.६८ इतकी होती. १७ मे रोजी जलसंपदा विभागाव्दारा उपलब्ध पाणीसाठ्याच्या गोषवाऱ्यानुसार या सर्व प्रकल्पांत २९३.०४ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ३२.८२ इतकी आहे. म्हणजेच एका आठवड्यात या सर्व प्रकल्पांचा जलसाठा १४.०३ दलघमीने कमी झाला आहे. १.८६ ने टक्केवारी कमी झाली आहे. सिंचन, औद्योगिक व पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचा वापर दररोज एक दलघमी गृहित धरल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्ह्यात ८० प्रकल्पांत जितका जलसाठा शिल्लक आहे, त्यातुलनेत ७० टक्के साठा उर्ध्व प्रकल्पात असून या प्रकल्पात दोन आठवड्यांपूर्वी १८३.२३ व मागील आठवड्यात १८०.१४ दलघमी जलसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत या आठवड्यात १७२.४९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. एका आठवड्यात ८.६५ दलघमीने पाण्याची पातळी कमी झाली आहे. धरणात सद्यस्थितीत ३०.५८ टक्के साठा आहे. यातील गाळ व मृतसाठा १० टक्के गृहित धरल्यास प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा आहे. जलसाठ्यातील पाण्याचे नियोजन नसल्यास उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर ही धोक्याची घंटा आहे. साठवण परिसराची खोली अधिक हवीधरणाचे पाणीसाठवण क्षेत्र जितके पसरट तेवढेच बाष्पीभवन अधिक होते. त्यामुळे हे क्षेत्र अधिकाअधिक असावयास हवे. याउपरही बाष्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्यातरी जलसंपदा विभागाकडे बाष्पीभवन थांबविण्यासाठी सक्षम पर्याय नसल्याचे या विभागाने सांगितले.बाष्पीभवन थांबविणे शक्य पण महागडेधरणाचे पाणीसाठवण क्षेत्र पसरट बशीच्या आकाराचे असते. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने बाष्पीभवन होते. हे थांबविण्यासाठी पाण्यावर केमिकल पसरविले जाते. त्यामुळे सूर्यकिरणांचा पाण्याशी थेट संपर्क होत नाही. परंतु ही प्रक्रिया खूप महागडी आहे, असे जलसंपदाच्या अभियंत्यांनी सांगितले.