शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कधी पैशांचा पाऊस; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST

अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या गावात भानामतीच्या संशयावरून महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. ...

अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या गावात भानामतीच्या संशयावरून महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. त्याअनुषंगाने ‘भानामती’ चर्चिली जात आहे. जिल्ह्यातही अलीकडे दोन घटनांमध्ये भानामतीचा दावा करण्यात आला. त्यातील एका प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. एका प्रकरणात अभा अंनिसने तो दावा सप्रमाण खोटा ठरविला. कधी पैशांचा पाऊस; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती होत असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. जिल्ह्यात अनेक ठिकाणी करणी केल्याच्या वादातून मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी नोंदविल्या जातात. मात्र, त्यात केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात येतो.

भानामतीत हे घडत असल्याचा दावा

घरातील कपडे पेट घेणे, कपडे फाटणे, अन्नात विष्ठा येऊन पडणे, घरातील भांडी स्थलांतरित होणे, शरीरावर फुल्या उमटणे, अंगावर जखमा होणे, घरावर दगड पडणे, घरातून पैसे नाहीसे होणे, अंगणात वस्तू येऊन पडणे, डोळ्यातून हळदी कुंकू येऊन पडणे, तोंडातून सुया पडणे, घरातील भिंतींवर संदेश लिहिल्या जाणे, घरातीलच साहित्याने -धान्याने एखादे नाव लिहिल्या जाणे किंवा काही चिन्ह बनविले जाणे, अशा एक ना अनेक प्रकारच्या घटना भानामतीमध्ये घडत असल्याचा दावा केला जातो.

सन २०१३ मध्ये झाला कायदा

महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३’, जो सामान्यत: अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून ओळखला जातो, तो राज्यात २६ ऑगस्ट २०१३ पासून अमलात आला. या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात.

घटना १

अचलपूर तालुक्यातील सावळी येथील सपन हनुमान मंदिर परिसरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यासाठी एका १६ वर्षीय मुलीला भरीस घालण्यात आले. त्या प्रकरणात दहा जणांविरूद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाहून बाहुली, रक्ताळलेले कपडे, मिरच्या जप्त करण्यात आल्या होत्या.

घटना दुसरी

डिसेंबर २०२० मध्ये टाकरखेडा पूर्णा येथील पातालबन्सी कुटुंबीयाने त्यांच्या घरात भानामतीमुळे रहस्यमयी आग लागत असल्याचा दावा केला होता. मात्र, अभा अंनिसने तो दावा सत्यशोधनाअंती खोटा ठरविला. ती आग मानवी हस्तक्षेपामुळे लागत असल्याचा निष्कर्ष अभा अंनिसने काढला होता.