शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कधी पैशांचा पाऊस; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST

अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या गावात भानामतीच्या संशयावरून महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. ...

अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या गावात भानामतीच्या संशयावरून महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. त्याअनुषंगाने ‘भानामती’ चर्चिली जात आहे. जिल्ह्यातही अलीकडे दोन घटनांमध्ये भानामतीचा दावा करण्यात आला. त्यातील एका प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. एका प्रकरणात अभा अंनिसने तो दावा सप्रमाण खोटा ठरविला. कधी पैशांचा पाऊस; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती होत असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. जिल्ह्यात अनेक ठिकाणी करणी केल्याच्या वादातून मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी नोंदविल्या जातात. मात्र, त्यात केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात येतो.

भानामतीत हे घडत असल्याचा दावा

घरातील कपडे पेट घेणे, कपडे फाटणे, अन्नात विष्ठा येऊन पडणे, घरातील भांडी स्थलांतरित होणे, शरीरावर फुल्या उमटणे, अंगावर जखमा होणे, घरावर दगड पडणे, घरातून पैसे नाहीसे होणे, अंगणात वस्तू येऊन पडणे, डोळ्यातून हळदी कुंकू येऊन पडणे, तोंडातून सुया पडणे, घरातील भिंतींवर संदेश लिहिल्या जाणे, घरातीलच साहित्याने -धान्याने एखादे नाव लिहिल्या जाणे किंवा काही चिन्ह बनविले जाणे, अशा एक ना अनेक प्रकारच्या घटना भानामतीमध्ये घडत असल्याचा दावा केला जातो.

सन २०१३ मध्ये झाला कायदा

महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३’, जो सामान्यत: अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून ओळखला जातो, तो राज्यात २६ ऑगस्ट २०१३ पासून अमलात आला. या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात.

घटना १

अचलपूर तालुक्यातील सावळी येथील सपन हनुमान मंदिर परिसरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यासाठी एका १६ वर्षीय मुलीला भरीस घालण्यात आले. त्या प्रकरणात दहा जणांविरूद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाहून बाहुली, रक्ताळलेले कपडे, मिरच्या जप्त करण्यात आल्या होत्या.

घटना दुसरी

डिसेंबर २०२० मध्ये टाकरखेडा पूर्णा येथील पातालबन्सी कुटुंबीयाने त्यांच्या घरात भानामतीमुळे रहस्यमयी आग लागत असल्याचा दावा केला होता. मात्र, अभा अंनिसने तो दावा सत्यशोधनाअंती खोटा ठरविला. ती आग मानवी हस्तक्षेपामुळे लागत असल्याचा निष्कर्ष अभा अंनिसने काढला होता.