शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लिनचीट’ मिळालेल्या कर्मचाऱ्यांवरही फौजदारी

By admin | Updated: May 2, 2015 00:19 IST

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील अपहारप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे.

तक्रार : पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धावअमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील अपहारप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे. यात ‘क्लिनचीट’ मिळालेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे असल्याने ते चक्रावून गेले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धाव घेत निवेदन सादर केले आहे.सेवानिवृत्त अधीक्षक रामदास डोंगरे, सहायक क्षेत्रिय अधिकारी मंगेश वाटाणे यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात महापालिका प्रशासनाने २९ एप्रिल रोजी येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संत सांस्कृतिक भवनात अपहार झाल्याप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. मात्र, या तक्रारीत समाविष्ट दोन नावांना यापूर्वीच सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्यांनी निर्दोष सिद्ध केले आहे. असे असताना सांस्कृतिक भवनाचे अपहार प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घेतला असताना आम्ही दोषी कसे?, असा सवाल रामदास डोंगरे यांनी उपस्थित केला आहे. सांस्कृतिक भवनाचे भाडे कार्यक्रमधारकांनी भरले नाही, वीज वापराच्या रक्कमेसह एकूण ९६ हजार २०३ रुपये भरण्यात आले नाहीत, असे तत्कालीन व्यवस्थापक पंकज डोनारकर यांनी कबूल केले आहे. परंतु विभाग प्रमुख पदी असल्याने लेखापरीक्षणाच्या अहवालात नाव आल्याचे डोंगरे यांचे म्हणणे आहे. तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक भागवत वारंवार रजेवर जात असल्याने या विभागाचा प्रभार मला देण्यात आला. त्यावेळी माझ्याकडे कर अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार, सामान्य प्रशासन, सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्याचा अतिरिक्त प्रभार देखील होता. तरीदेखील बाजार परवाना विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. मी स्वत: सांस्कृतिक भवनाची पाहणी केली असता नोंदवहीत व्यवस्थित नोंदी नव्हत्या. रेकॉर्डची जुळवाजुळव आढळली नाही. परिणामी तेंव्हा सांस्कृतिक भवनाचे लेखापरीक्षण करुन कार्यवाही करावी, असे आपण प्रस्तावित केले होते. तशा नोंदी लेखापरिक्षण अहवालात आहेत. दरम्यान मिश्रा नामक व्यवस्थापकाचे निलंबन देखील करण्यात आले होते. विभाग प्रमुखाचा पावती पुस्तकाशी काहीही संबंध नाही. तरीदेखील विभागप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दाखल करण्यात आलेली तक्रार मुळातच खोटी आहे. सांस्कृतिक भवनातील घोटाळ्यात मुख्य अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. अधीक्षक, निरीक्षकांचा कोठेही संबंध नसताना या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. पोलिसांकडे दाद मागितली असून प्रसंगी उच्च न्यायालयात जाऊ.- रामदास डोंगरे,सेवानिवृत्त अधिकारी, महापालिका.