शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पन्नाशी उलटली तरी मेळघाटात बदली; अग्निपरीक्षा घेताय का?

By जितेंद्र दखने | Updated: May 8, 2023 21:27 IST

सहाव्या टप्पा : प्रशासनाकडे मांडली बाजू

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात मेळघाटात रवानगी केलेले ३०६ शिक्षक सध्या विविध कारणांमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या शिक्षकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी व गाऱ्हाणी मांडली आहेत. यावर प्रशासन आमची बाजू ऐकून घेत नसल्याची ओरड या शिक्षकांची आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपली असली तरी या प्रक्रियेत ३०६ शिक्षकांची मेळघाटमध्ये बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील बहुतांश शिक्षक हे ५२ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. यातील अनेकांनी यापूर्वी मेळघाटात सेवा दिलेली आहे. बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा हा चुकीच्या पद्धतीने राबविला गेला. या बदलीबाबत कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ३०६ शिक्षकांची मेळघाटात बदली करण्यात आली. मात्र, आता आमची बाजू कुणीही समजून घेत नसल्याची ओरड या शिक्षकांची आहे. याशिवाय सुनावणीही घेतली जात नसल्याचे म्हणणे आहे. दरम्यान, शिक्षक विभागाकडे या बदल्यांसंदर्भात शिक्षकांनी आतापर्यंत २००च्या वर आपल्यावरील अन्याय दूर करण्याबाबत लेखी आक्षेप व तक्रारी तक्रार निवारण कक्षाकडे सादर केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने निराकरण करण्यासाठी आता शिक्षण विभागाचे अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आमची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी देवेंद्र खैर, पंडित भोयर, देवेंद्र ढोक, सुजाता गजभिये, राजेश गजभिये व अन्य अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली आहे.तर सपाटीवरील शाळेत शिक्षक राहणार नाहीत

गैरआदिवासी भागातील म्हणजेच सपाटीवरील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३०६ शिक्षकांना मेळघाटमध्ये बदलीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सपाटीवरील शाळांमध्ये शिक्षकांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती