शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

सिमेंट रस्ते निर्मितीनंतरही वृक्षकटाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:14 IST

वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचा सिलसिला सुरूच आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देपांढुर्णा रस्त्याचे वास्तव : केंद्र सरकारची परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचा सिलसिला सुरूच आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.वृक्षकटासाठी केंद्र सरकारच्या वने, पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्यापही परवानगी मिळाली नाही. परंतु सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य वृक्ष कटाईमुळे थांबू नये, असे मौखिक आदेश एका बड्या वनाधिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे वृक्षांचे मूल्यांकनानुसार १.८८ कोटी रूपये असताना ते ४६ लाख, ७२ हजार २०३ रुपयांत कंत्राटदारास देण्यात आले. मात्र, पांढुर्णा ते वरुड सिमेंट रस्ता वृक्षामुळे थांबू नये, यासाठी थेट मंत्रालयातून दबाव आणला गेला. घिसाळघाईमुळे वरूड वनपरिक्षेत्रातून मात्र, जरूड, मोर्र्शी, निंभी परिसरात रस्त्याचे काम झाल्यानंतरही वृक्ष कापले जात आहे. वास्तविकतपणे ९ मीटरच्या आतच वृक्ष कापल्या गेली पाहिजे, त्यापेक्षा जास्त अंतरावरील वृक्ष कापू नये, अशी नियमावली आहे.१९ लाख रूपयांचा जीएसटी बुडालावृक्ष कापण्यासाठी मूल्यांकन झाले असता त्याची किंमत १.८८ कोटी रूपये होते. मात्र, कंत्राटदारांनी ४६ लाख, ७२ हजार २०३ रुपयांत वृक्षांचे दर करवून आणले. लाकूड विक्रीतून १९ लाख रुपये जीएसटी वसूल केले नाही. कंत्राटदाराला अभय मिळत असल्याचे दिसून येते.