शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

१४ ग्रामपंचायतीचे ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापन, सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती

By जितेंद्र दखने | Updated: July 20, 2023 19:08 IST

अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या ...

अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या १४ गावांचे जिल्हास्तरीय समितीमार्फत ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया १७ जुलैपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नेतृत्वात सात सदस्यीय समिती गावांची प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करीत आहे."राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत जिल्हास्तरावर १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ‘आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव‘ योजनेंतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या कामकाजाचे मूल्यमापन तसेच दस्तऐवजाची जिल्हास्तरीय समितीची तपासणीची मोहीम १७ ते २७ जुलैपर्यंत केली जाणार आहे. झेडपीचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख, बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे आदींचा सहभाग असलेली जिल्हास्तरीय समिती स्मार्ट ग्रामचे मूल्यमापन करीत आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने ग्रामीण भागासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत तालुकास्तरावर चौदा व जिल्हास्तरावर एका गावाची स्मार्ट ग्राम म्हणून निवड केली जाते. तालुकास्तरावर निवड झालेल्या गावांना प्रत्येकी दहा लाख, तर जिल्हास्तरावरील गावास चाळीस लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावात काय कामे करायची आहे, याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून दिल्या जातात. यंदा या योजनेत जिल्हास्तरावर १४ गावे निवडली असून जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी या गावात स्पर्धा निर्माण झाली आहे. तपासणी समितीकडून गावांतील विकासकामांची पाहणी केली जात आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावरील स्मार्ट गावाची निवड जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अशी आहेत गावेस्मार्ट ग्राम योजनेत पिंपयखुटा (ता. वरूड), लिहिदा (मोर्शी), देवरी (भातकुली), भारवाडी (तिवसा), बोरगाव धर्माळे (अमरावती), राजना (चांदूर रेल्वे), हिंगणगाव, (धामणगाव रेल्वे), पाळा (नांदगाव खंडेश्वर), नरदोडा (दर्यापूर), काळगव्हाण (अंजनगाव सुर्जी), तळवेल (चांदूर बाजार), मल्हारा (अचलपूर), झिल्पी (धारणीड), भुलोरी (चिखलदरा) या गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती