शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नुकसानभरपाईच्या धनादेशात चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

मोर्शी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा धनादेशावर शब्दांत १२ लाख ३५ हजार ४०० व अक्षरात १ लाख २३ हजार ...

मोर्शी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा धनादेशावर शब्दांत १२ लाख ३५ हजार ४०० व अक्षरात १ लाख २३ हजार ५४० रुपये असे वेगवेगळे लिहिण्यात आल्याने बँकेने तो धनादेश तहसीलदार कार्यालयात परत केला. परिणामी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची ती रक्कम अद्यापही जमा झालेली नाही.

मोर्शी तालुक्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यामुळे पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा करण्यात आली नसल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, आनंद सदातपुरे, अंकुश घारड यांच्या नेतृत्वात तहसीलदारांकडे दाद मागण्यात आली.

दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाचा १२ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा धनादेश जिल्हा बँकेच्या मोर्शी शाखेत पाठविण्यात आला. परंतु, तो धनादेश चक्क १ लाख २३ हजार ५४० रुपयांचा लिहिण्यात आल्याने बँकेने तो धनादेश तहसील कार्यालयाला परत केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तहसीलदारांविरुद्ध तीव्र रोष निर्माण झाला आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धाव घेऊन चुकीचा धनादेश पाठविल्याबद्दल विचारपूस केली असता, तहसीलदारांनी गायकवाड हे सुटीवर असल्याने धनादेश पाठविण्यास विलंब झाला तसेच या प्रकरणी तलाठ्यावर कारवाई करण्यात येईल, अशी उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना दिली. ज्यांनी हा चुकीचा धनादेश लिहिला, त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्यावतीने धनादेश लिहिताना चूक झाली असली तरी स्वाक्षरी करणारे प्रथम श्रेणी अधिकारी तहसीलदारांनी डोळे बंद करून स्वाक्षरी केली का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.