शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘डीटीई’च्या नोटिफिकेशनमध्ये त्रुटी!

By admin | Updated: June 1, 2016 00:42 IST

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाने नुकतेच नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : पाच टक्के गुणांची तफावत अमरावती : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाने नुकतेच नोटिफिकेशन जाहीर केले आहे. परंतु या नोटिफिकेशनमध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे. या त्रुटीपूर्ण नोटिफिकेशनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने मागील वर्षी महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम २०१५ पारित केला. त्यातील तरतुदीनुसार आता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अनुषंगाने डीटीईने इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी (लेटरल टू एन्ट्री टू सेकंड इअर), फॉर्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी व डिप्लोमा इंजिनीयरिंग अ‍ॅन्ड टेक्नालॉजी या सहा प्रोग्रामाबद्दल नोटिफिकेशन दिले आहे. यात अभ्यसक्रमाचा कालावधी, पात्रता निकष जाहीर करण्यात येत आहेत. यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप होत आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रातील एआईसीटीई ही सर्वोच्च संस्था आहे. डीटीई ही राज्यस्तरावर काम करते. मात्र, इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या चार वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेशाची पात्रता एआयसीटीईने ४५ टक्के गुण अशी ठरविली असताना डीटीईने मात्र हीच पात्रता ५० टक्के गुणांवर पोहोचविली आहे. भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याने रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र आणि टेक्निकल व्होकेशनल यापैकी एका विषयात ४५टक्के गुण ‘एआय सीटीई’ने अनिवार्य केले आहेत. डीटीईने यापैकी कुठल्याही एका विषयात ५० टक्के गुण अनिवार्य हा निकष ठरविला आहे. एआयसीटीई आणि डीटीई या उभय संस्थांनी प्रवेशपात्रतेसंदर्भात घातलेला हा घोळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला ग्रहण लावणारा आहे. याशिवाय या नोटिफिकेशनमध्ये अन्य त्रुटीसुद्धा आहेत. एआयसीटीई आणि डीटीईने पात्रतेत घातलेली पाच टक्क्यांची तफावत विद्यार्थ्यांना मारक ठरणारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.