शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

डेंग्यूची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:59 IST

जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे रक्तजलनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात साथ पसरण्याची भीतीतीन दिवसांत सात रुग्ण : खासगी रुग्णालयात संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे रक्तजलनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.जून महिन्यात एकूण १४ डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले. जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत सात रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये डॉ. मनोज निचत यांच्याकडे चार, दयासागरमध्ये दोन, तर एक रुग्ण डॉ. अजय डफळेंकडे दाखल आहे. हे सातही रुग्ण गणेशनगर, ज्योती कॉलनी, चक्रधरनगर, नवाथेनगर, नवी वस्ती बडनेरा व महालक्ष्मीनगर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारी ते २ जुलैपर्यंत एकूण ३० संशयित रुग्णांचे सिरम सॅम्पल जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यामार्फत यवतमाळला पाठविले असून, १२ डेंग्यू निगेटिव्ह आढळून आले. १८ रुग्णांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांत डेंग्यूचे सात रुग्ण संशयित आढळल्याने साथीची भीती व्यक्त होत आहे.लागण कशी होते?स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा एडीस इजिप्ती हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळ्यानंतर तापमानात होत असलेल्या चढ-उतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की, डेंग्यूची लागण होते.लक्षणेडेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणू संसर्गाप्रमाणेच असतात. मात्र, काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की, असह्य डोकेदुखी होऊ लागते. उलट्या होतात. अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात. अंगावर चट्टेही उठतात.साचलेले पाणी काढून टाकाघरात पाण्याचा साठा केल्यास या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. उन्हाळ्यात कूलरच्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत, याची काळजी घेतल्यास डेंग्यू व मलेरिया या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे डास दिवसा चावत असल्याने दिवसादेखील डासांपासून संरक्षणाची गरज असते .तीन दिवसांत खासगी रुग्णालयात डेंग्यूसंशयित म्हणून सात रुग्णांची नोंद झाली. त्या सातही रुग्णांचे रक्तजलनमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले. डेंग्यूची साथ आटोक्यात आहे. महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.- डॉ. सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका