शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी रोजगाराची संधी वाढवावी

By admin | Updated: October 29, 2016 00:25 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सोमवारी उद्योजकांची सभा पार पडली.

नितीन धांडे : विद्यापीठात उद्योजकांची सभा अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सोमवारी उद्योजकांची सभा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, कृषीक्षेत्रात विकासाच्या अनेक वाटा आहेत. कृषीवर आधारित जास्तीत जास्त उद्योग विकसित झाले पाहिजेत, अन्नदात्या शेतकऱ्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो. शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग सुरू होऊन शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल, याचा विचार उद्योन्मुख उद्योजकांनी विशेषत: व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी एमबीए विभागप्रमुख संतोष सदार, राजेश चांडक उपस्थित होते. तीन सत्रांतर्गत हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रात कमलेश डागा, वीरेंद्र लढ्ढा, महेंद्र भुतडा, अशोक सोनी, दुसऱ्या सत्रात अनिकेत ठाकूर, हेमंत ठाकरे, परेश राजा, अविनाश कानतुटे तर तिसऱ्या सत्रात अरूण वरणगावकर, रणजित बंड, रवी पाटील यांनी उद्योजकांच्या समस्या व त्यांचे उद्योजक म्हणून असलेले अनुभव कथन केले. अध्यक्षीय भाषण करताना विभागप्रमुख संतोष सदार म्हणाले, विद्यापीठाच्या एमबीए विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व अनुभव देण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याने विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळत आहे. विद्यापीठाचा एमबीए विभाग महाराष्ट्रात अग्रणी स्थान टिकून आहे. विद्यार्थ्यांचा विकास करण्यात सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.