शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

प्राथमिक शाळा सक्षम केल्यास गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:14 IST

शासनाने प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण केल्यास जि.प.च्या सर्व शाळांमधून दर्जेदार शिक्षणासह गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास ...

विविधांगी चर्चा : प्राथमिक शिक्षक समिती कार्यकारिणीची बैठकअमरावती : शासनाने प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण केल्यास जि.प.च्या सर्व शाळांमधून दर्जेदार शिक्षणासह गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. या बैठकीला राज्यभरातून ३०० हून अधिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शाळांची गुणवत्ता सुधारण्यााठी १:३० प्रमाणे शिक्षक द्यावेत, पुरेशा वर्गखोल्या पुरवाव्यात, पाणी व वीज मोफत हवी, गणवेश वितरणातील भेदभाव थांबवावा, त्याचप्रमाणे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी संघटनांना अधिकाधिक वेळा न्यायालयाचे दार ठोठवावे लागते. त्यामुळे शासनाने संघटनांशी सुसंवाद साधून मार्ग काढावा, असे यावेळी बोरसे पाटील म्हणाले. आरटीईची अंमलबजावणी करताना शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. मात्र या निर्णयाचा मोठा फटका मुलींच्या शिक्षणाला बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाला शिक्षक समितीचा विरोध असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. इंग्रजीच्या काळात खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा कल थांबवावा, यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांमधून सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू करावे, असे देखील या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला उपस्थित सदस्यांनी यावेळी त्यांचे विचार व्यक्त केलेत. बैठकीला लक्षणीय संख्येने उपस्थिती होती.