शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेन

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही.

अजयवीर जाखड : राजकारणात मला रस नाहीलोकमत मुलाखतसंदीप मानकर अमरावतीमाझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत झटत राहू असे मत भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयवीर जाखड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊ साहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना न्याय, सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. आज ६० वर्ष पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचा मुलगा चांगला शिकला पाहिजे. परंतु राजकारणी लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात विशेषत: अमरावतीत टेक्सस्टाईल हब सुरू होत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला उत्पादन खर्चावर भाव देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.भारताचे भविष्य गावात आहे. परंतु सरकारच्या योजना फक्त शहरासाठी तयार होतात. परंतु ग्रामीण भागाकडे त्यांनी पाठ फिरविल्याचा आरोप यावेळी जाखड यांनी केला. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडणुकीच्या वेळी राजकारण केले जाते. आतातरी मताची किंमत ओळखून आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न निवडता सकारात्मक मानसिकता जपली पाहिजे. माध्यमांनी सुध्दा शहराच्या समस्यांऐवजी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ताकतीने मांडल्या गेल्या पाहिजे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आरक्षणासाठी लढत आहे, तसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरीत किमान २५ टक्के आरक्षण असले पाहिजे. असे झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती उंचावून शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत होईल. शेतकरी आर्थिकरीतीने सक्षम झाल्यास गावाच्या विकास होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या काही शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत ते राजकर्त्यांशी साटेलोटे ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाज दाबल्या गेला आहे. प्रत्येक राज्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातून कपासीवर नियमित बंदी लादली त्या वेळेस १८ महिन्यात सरकारला १७ वेळा अधिसूचना बदलावी लागली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतो. नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात रिजर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी भारत कृषक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते.