शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
9
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
10
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
11
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
12
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
13
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
14
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
15
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
16
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
17
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
18
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
19
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
20
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेन

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही.

अजयवीर जाखड : राजकारणात मला रस नाहीलोकमत मुलाखतसंदीप मानकर अमरावतीमाझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत झटत राहू असे मत भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयवीर जाखड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊ साहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना न्याय, सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. आज ६० वर्ष पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचा मुलगा चांगला शिकला पाहिजे. परंतु राजकारणी लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात विशेषत: अमरावतीत टेक्सस्टाईल हब सुरू होत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला उत्पादन खर्चावर भाव देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.भारताचे भविष्य गावात आहे. परंतु सरकारच्या योजना फक्त शहरासाठी तयार होतात. परंतु ग्रामीण भागाकडे त्यांनी पाठ फिरविल्याचा आरोप यावेळी जाखड यांनी केला. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडणुकीच्या वेळी राजकारण केले जाते. आतातरी मताची किंमत ओळखून आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न निवडता सकारात्मक मानसिकता जपली पाहिजे. माध्यमांनी सुध्दा शहराच्या समस्यांऐवजी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ताकतीने मांडल्या गेल्या पाहिजे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आरक्षणासाठी लढत आहे, तसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरीत किमान २५ टक्के आरक्षण असले पाहिजे. असे झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती उंचावून शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत होईल. शेतकरी आर्थिकरीतीने सक्षम झाल्यास गावाच्या विकास होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या काही शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत ते राजकर्त्यांशी साटेलोटे ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाज दाबल्या गेला आहे. प्रत्येक राज्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातून कपासीवर नियमित बंदी लादली त्या वेळेस १८ महिन्यात सरकारला १७ वेळा अधिसूचना बदलावी लागली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतो. नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात रिजर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी भारत कृषक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते.