शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मार्चअखेर ७४२ गावांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:01 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्दे९०२ उपाययोजनांची मात्रा : दोन कोटींचा निधी प्रस्तावित

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी मार्च २०१८ पर्यत जिल्हा प्रशासनाने ९०२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यावर १ कोटी ९८ लाख ७४ हजारांचा निधी खर्च केला जाणार आहे.पाच तालुक्यांमध्ये आताच नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तथापि, जिल्हा परिषदद्वारा पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी संभाव्य कृती आराखडा तब्बल महिनाभर उशिरा तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना चक्क दोन वेळा गंभीर पत्र द्यावी लागली. त्यानंतर कोठे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागाला जाग आली.पाच विभागाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालानुसार अमरावती तालुक्यात ४९ गावांसाठी १ कोटी १८ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २३ गावांमध्ये ८० लाख २० हजार, भातकुली तालुक्यात २३ गावांमध्ये ४८ लाख ६० हजार, तिवसा तालुक्यात ३६ गावंमध्ये ७३ लाख ७५ हजार, मोर्शी तालुक्यात २८ गावांमध्ये ५७ लाख ६० हजार, वरूड १२ गावांमध्ये १० लाख ८० हजार चांदुर रेल्वे ३५ लाख ९९ हजार, धामणगाव ६२ लाख ८६ हजार, अचलपूर १ कोटी २ लाख, चांदूरबाजार ७० लाख, अंजनगाव सुर्जी ७६ लाख २० हजार, दर्यापूर ६८ लाख ५० हजार, धारणी ८२ लाख १४ हजार व चिखलदरा तालुक्यात १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे.नवीन २९८ विंधन विहिरी करणारजिल्ह्यात या कालावधीत नवीन २९८ विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी ३९ लाखांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये धामणगाव तालुक्यात सर्वाधिक ५९, अचलपूर ३२, चिखलदरा ५७, अचलपूर ३२, अंजनगाव सुर्जी २६, मोर्शी २३, तिवसा १७, अमरावती २७, नांदगाव खंडेश्वर १९, तर मोर्शी तालुक्यात २३ विंधन विहिरींचा समावेश आहे. ५८ कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ७० लाखांचा खर्च होणार आहे.१४७ नळयोजनांची विशेष दुरुस्तीजानेवारी ते मार्च २०१८ अखेर जिल्ह्यात १४७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ४ कोटी १० लाख ५० हजारांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात २६, भातकुली १४, तिवसा १८, चांदूरबाजार १२, अंजनगाव सुर्जी १७, दर्यापूर तालुक्यात २३ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. ७४ तात्पुरत्या नळ योजना करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी १२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.