शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मार्चअखेर ७४२ गावांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:01 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्दे९०२ उपाययोजनांची मात्रा : दोन कोटींचा निधी प्रस्तावित

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी मार्च २०१८ पर्यत जिल्हा प्रशासनाने ९०२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यावर १ कोटी ९८ लाख ७४ हजारांचा निधी खर्च केला जाणार आहे.पाच तालुक्यांमध्ये आताच नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तथापि, जिल्हा परिषदद्वारा पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी संभाव्य कृती आराखडा तब्बल महिनाभर उशिरा तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना चक्क दोन वेळा गंभीर पत्र द्यावी लागली. त्यानंतर कोठे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागाला जाग आली.पाच विभागाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालानुसार अमरावती तालुक्यात ४९ गावांसाठी १ कोटी १८ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २३ गावांमध्ये ८० लाख २० हजार, भातकुली तालुक्यात २३ गावांमध्ये ४८ लाख ६० हजार, तिवसा तालुक्यात ३६ गावंमध्ये ७३ लाख ७५ हजार, मोर्शी तालुक्यात २८ गावांमध्ये ५७ लाख ६० हजार, वरूड १२ गावांमध्ये १० लाख ८० हजार चांदुर रेल्वे ३५ लाख ९९ हजार, धामणगाव ६२ लाख ८६ हजार, अचलपूर १ कोटी २ लाख, चांदूरबाजार ७० लाख, अंजनगाव सुर्जी ७६ लाख २० हजार, दर्यापूर ६८ लाख ५० हजार, धारणी ८२ लाख १४ हजार व चिखलदरा तालुक्यात १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे.नवीन २९८ विंधन विहिरी करणारजिल्ह्यात या कालावधीत नवीन २९८ विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी ३९ लाखांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये धामणगाव तालुक्यात सर्वाधिक ५९, अचलपूर ३२, चिखलदरा ५७, अचलपूर ३२, अंजनगाव सुर्जी २६, मोर्शी २३, तिवसा १७, अमरावती २७, नांदगाव खंडेश्वर १९, तर मोर्शी तालुक्यात २३ विंधन विहिरींचा समावेश आहे. ५८ कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ७० लाखांचा खर्च होणार आहे.१४७ नळयोजनांची विशेष दुरुस्तीजानेवारी ते मार्च २०१८ अखेर जिल्ह्यात १४७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ४ कोटी १० लाख ५० हजारांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात २६, भातकुली १४, तिवसा १८, चांदूरबाजार १२, अंजनगाव सुर्जी १७, दर्यापूर तालुक्यात २३ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. ७४ तात्पुरत्या नळ योजना करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी १२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.