शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

मार्चअखेर ७४२ गावांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:01 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्दे९०२ उपाययोजनांची मात्रा : दोन कोटींचा निधी प्रस्तावित

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी मार्च २०१८ पर्यत जिल्हा प्रशासनाने ९०२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यावर १ कोटी ९८ लाख ७४ हजारांचा निधी खर्च केला जाणार आहे.पाच तालुक्यांमध्ये आताच नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तथापि, जिल्हा परिषदद्वारा पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी संभाव्य कृती आराखडा तब्बल महिनाभर उशिरा तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना चक्क दोन वेळा गंभीर पत्र द्यावी लागली. त्यानंतर कोठे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागाला जाग आली.पाच विभागाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालानुसार अमरावती तालुक्यात ४९ गावांसाठी १ कोटी १८ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २३ गावांमध्ये ८० लाख २० हजार, भातकुली तालुक्यात २३ गावांमध्ये ४८ लाख ६० हजार, तिवसा तालुक्यात ३६ गावंमध्ये ७३ लाख ७५ हजार, मोर्शी तालुक्यात २८ गावांमध्ये ५७ लाख ६० हजार, वरूड १२ गावांमध्ये १० लाख ८० हजार चांदुर रेल्वे ३५ लाख ९९ हजार, धामणगाव ६२ लाख ८६ हजार, अचलपूर १ कोटी २ लाख, चांदूरबाजार ७० लाख, अंजनगाव सुर्जी ७६ लाख २० हजार, दर्यापूर ६८ लाख ५० हजार, धारणी ८२ लाख १४ हजार व चिखलदरा तालुक्यात १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे.नवीन २९८ विंधन विहिरी करणारजिल्ह्यात या कालावधीत नवीन २९८ विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी ३९ लाखांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये धामणगाव तालुक्यात सर्वाधिक ५९, अचलपूर ३२, चिखलदरा ५७, अचलपूर ३२, अंजनगाव सुर्जी २६, मोर्शी २३, तिवसा १७, अमरावती २७, नांदगाव खंडेश्वर १९, तर मोर्शी तालुक्यात २३ विंधन विहिरींचा समावेश आहे. ५८ कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ७० लाखांचा खर्च होणार आहे.१४७ नळयोजनांची विशेष दुरुस्तीजानेवारी ते मार्च २०१८ अखेर जिल्ह्यात १४७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ४ कोटी १० लाख ५० हजारांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात २६, भातकुली १४, तिवसा १८, चांदूरबाजार १२, अंजनगाव सुर्जी १७, दर्यापूर तालुक्यात २३ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. ७४ तात्पुरत्या नळ योजना करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी १२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.