शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:17 IST

शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे ......

ठळक मुद्देप्रशासन झोपेत : बिच्छन नदीपात्रातही घुसखोरी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे संतापजनक चित्र असून प्रशासनाची डोळेझाक अतिक्रमणधारकांना पाठबळ देणारी ठरली आहे.परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात पूर्वीच अतिक्रमण काढण्यावरून प्रशासनाची टोलवाटोलवी, राजकारण्यांची मुकसंमती सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारी ठरली आहे. नजर जाईल तिकडे अतिक्रमणाचा विळखा नियम धाब्यावर बसविणारा ठरला असताना यातून मोठी दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाचे कार्य कुठले यावरच शहरातील चौकामध्ये सुरू असणाºया चर्चा बºयाच बोलक्या ठरल्या आहेत. वाहतुकीचा अडथळा होताच पोलीस प्रशासनावर बोट ठेवले जात असताना अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची असून यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील बैठका वांझोट्या ठरल्या आहेत. रस्त्यांवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गतिरोधक नसल्याने जिवीतहानी नसली तरी धूम स्टाईलने भरधाव दुचाकी दामटणाºयांची दादागिरी सर्रास बघायला मिळते.अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या महत्प्रयासाने शहरात बैतूल स्टॉप ते अचलपूर नाक्यापर्यंत इंदूर-अमरावती महामार्गाचे शहराच्या हद्दीत चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. वाघामाता मंदिरापुढेही अतिक्रमण सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत.नदीपात्रातही घुसखोरीअतिक्रमणासाठी वाट्टेल त्या शासकीय जागेवर आपला हक्क दाखविण्याची स्पर्धाच जणू शहरात सुरू आहे. लालपूल परिसरातील धारणी मार्गावर बिच्छन नदीपात्रात थेट घुसण्याचा महाप्रताप करण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमणाचा विळखा अतिक्रमणधारकांसह रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या जिवावर बेतणारा ठरला असताना त्यावर कोण कारवाई करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.वृक्ष लागवडीचा फायदा काय ?राज्यभर दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सामाजिक संस्था एकवटल्या असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या सुरू असलेली वृक्षतोड पाहता त्यासाठी प्रशासन कुठलीच कारवाही करीत नसल्याने वृक्षतोड करणाºयांचे मनोबल वाढल्याने वृक्षारोपणाचा फायदा काय, असा सवाल आता वृक्षप्रेमी करीत आहे