शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

अतिक्रमण हटविण्याचे आदेश कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

अमरावती : ग्रामपंचायतीच्या व शासकीय जागेत गावोगावी वाढणाऱ्या अतिक्रमणाला पायबंद घालण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाविण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ...

अमरावती : ग्रामपंचायतीच्या व शासकीय जागेत गावोगावी वाढणाऱ्या अतिक्रमणाला पायबंद घालण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाविण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ग्रामपंचायतीकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. परिणामी गावोगावी अतिक्रमण वाढत असल्याचे चित्र आहे.

शासकीय जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ नुसार ग्रामंचायतीव्दारे कारवाई अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीच्या व शासकीय जागेत अतिक्रमण असल्यास अशा नियमबाह्य अतिक्रमणाला पायबंद घालणे आवश्यक आहे. मात्र, गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. ग्रामपंचायतींनी अतिक्रमनधारकास नोटीस द्यावी व तीन महिन्यांनी संबंधितांना अतिक्रमण न काढल्यास पंचायत समितीच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढावे, अशा सूचना आहेत. मात्र अतिक्रमणाबाबत तक्रार आल्यासच कारवाई केली जाते. परंतु तक्रार नसल्यास वाढत्या अतिक्रमणाकडे कुणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेक गावांना अतिक्रमणाचा विळखा घातला आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणांवर कारवाईचे धाडस दाखविले जात नाही. ग्रामपंचायत निवडणुकांचे संदर्भ अशा कारवायांना अडथळा ठरतात. ही सर्व बाब लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर वाढते अतिक्रमण वेळीच हटविले तर पुढे ते वादग्रस्त ठरणार नाही. त्यासाठी शासनाचे आदेश कागदावरच न ठेवता त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

कोट

ग्रामपंचायत क्षेत्रात अतिक्रमण असल्यास संबंधितास कलम ५३ नुसार आवश्यक कारवाई केली जाते. अतिक्रमणासंदर्भात शासनाच्या सूचनेप्रमाणे कारवाई करावी, असे निर्देश ग्रामपंचायतींना दिले आहेत.

- दिलीप मानकर,

डेप्युटी सीईओ पंचायत