सन २०११ पूर्वी शासकीय जागेचे अतिक्रमण नियमित करण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने मोर्शी नगर परिषदेमध्ये ९६३ लाभार्थ्यांचे घरकुल शासनाने मंजूर केले होते. त्यामधील ३२१ लाभार्थी अतिक्रमणधारक होते. यामधील १९४ अतिक्रमणधारक पात्र असून, हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेला होता. परंतु, अतिक्रमण नियमित करण्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी नगरसेवक नईम खान यांच्या नेतृत्वात मोर्शी शहरातील अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे दिली. शासन-प्रशासनाला पंधरा विसाची मुदत देऊन त्यापुढे राहुटी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव फुके, प्रहारचे रवि परतेती, दानिश अहमद, समीर खान, जावेद हुसेन,अब्दुल इर्शाद, शकुर शहा, मनोज इडपाची, सुनिता कुमरे, इकबाल सय्यद, अनिल कुईटे उपस्थित होते.
मोर्शीतील अतिक्रमणधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST