शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

बचत गटांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 00:03 IST

राज्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे,

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे : विभागीय बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटनअमरावती : राज्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी ग्रामविकास विभागाचे व शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी बचत गटांना उद्योगाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदस्यांना बँकांकडून शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास, रोजगारहमी योजनामंत्री पंकजा मुंडे यांनी केले.ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना प्रचार व प्रसिद्धीअंतर्गत सायन्सस्कोर मैदानावर १० ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित विभागीय महिला मेळावा तसेच बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंच्या ‘विकास गंगोत्री’ या विभागीय स्तरावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून खा.अडसूळ, आमदार भिलावेकर, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रमेश बुंदिले, महापौर नंदा, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, यवतमाळ जि.प.च्या अध्यक्ष आरती फुफाटे, बुलडाण्याच्या अलका खंडारे, वाशिमच्या सोनाली जोगदंड, अकोल्याचे शरद गवई तसेच निवेदिता चौधरी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, विभागीय आयुक्त राजुरकर जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, मल्लिनाथ कलशेट्टी, प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, उपायुक्त आर.यू.अवचार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जि.प. उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती वृषाली विघे, लीना बनसोड आदींची उपस्थिती होती.चूल आणि मूल शाप नसून वरदानच !चूल आणि मूल हे महिलांसाठी शाप नसून वरदानच आहे. कारण चूल आणि मूल सांभाळणे हे फार मोठे जबाबदारीचे काम आहे. त्यात कमीपणा नसावा, आपले पाल्य संस्कारक्षम निर्माण व्हावेत यासाठी ही जबाबदारी आवश्यक आहे, असे सांगून ना.मुंडे म्हणाल्या, समाजातील माता, स्त्री सक्षम झाल्या पाहिजेत. स्त्रियांना नतमस्तक होऊन जबाबदारीच्या कामाचा श्रीगणेशा झाला पाहिजे. स्त्री समाजाचे पालन पोषण, सुसंस्कारित समाज निर्मिती करते, यासाठी त्यांच्या हाताला ताकद देण्याची आवश्यकता आहे. त्यांना निर्णय घेण्याची शक्ती द्या, त्याचा ते निश्चितच सदुपयोग करतील, असे ना.मुंडे म्हणाल्या.