शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर संक्रांत !

By admin | Updated: January 7, 2017 00:10 IST

महापालिका आस्थापनेवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावरही संक्रांत कोसळली आहे.

मानधन रखडले : आॅक्टोबरपासून ४०० कामगार वेतनाविना अमरावती : महापालिका आस्थापनेवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावरही संक्रांत कोसळली आहे. नियमित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राटींचे तुटपुंजे मानधन रखडल्याने त्यांची दैनावस्था झाली आहे. नियमांना फाटा देऊन केवळ पोटासाठी काम करणारे व केव्हाचीच पन्नाशी केव्हाचीच गाठलेले सुरक्षारक्षक तर डोळ्यांत प्राण आणून अल्पमानधनाची प्रतीक्षा करीत आहेत. सुरक्षारक्षक, संगणक आॅपरेटर आणि अन्य ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना आॅक्टोबरपासून वेतन मिळालेले नाही. काही सुरक्षारक्षक तर सप्टेंबरचेच मानधन अद्याप मिळाले नसल्याची खंत व्यक्त करतात. हातावर पोट असणारे हे कंत्राटी कर्मचारी महापालिका आयुक्तांकडे आशाळभूत नजरेने पाहात आहेत. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांनाही मर्यादा आल्या आहेत. पदभरतीवर बंदी असल्याने महापालिकेने ‘रूटीनवर्क’ साठी एजन्सीची मदत घेऊन त्यांचेकडून मानधनतत्वावर कंत्राटी कर्मचारी घेतले आहे. यात १७८ सुरक्षा रक्षकांसह ७५ च्या आसपास संगणक परिचालक, स्वास्थ्य निरीक्षक, शिपाई, बागवान, गवंडी, निवृत्त लेखाधिकारी व अन्य काहींचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांना महिन्याकाठी ८७२६ रूपयांच्या तुलनेत पाच-साडेपाच हजार रूपये मिळतात, संगणकचालकांना महिन्याकाठी ६,५०० रूपये व अन्य कर्मचाऱ्यांना ५ ते कमाल १० हजार रूपये एजन्सीकडून दिले जातात. मात्र, अनेकदा एजन्सीधारकांकडून देयके सादर करण्यास उशीर होत असल्याने निश्चित तारखेला मानधन दिले जात नाही. आयुक्तांनीच व्हावे उदार तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्याने सुरक्षा रक्षक, संगणक आॅपरेटर व अन्य कामगार - कर्मचाऱ्यांची आर्थिक विपदा कोसळली आहे. हातावर पोट असलेल्या या कर्मचाऱ्यांप्रती आता आयुक्तांनीच उदार व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्यातून व्यक्त होत आहे. घर चालवायचे कसे ? आमच्या पाच साडेपाच हजारावर घर चालत. पण, तीन महिन्यांपासून तेही मिळत नसल्याने घर चालवायचे तरी कसे, हासुरक्षारक्षकांचा प्रश्न मानधनापलिकडची वास्तविकता जाणवून देणारा आहे. सुमारे ७५ च्या घरात असलेल्या संगणक आॅपरेटर्सना आॅक्टोबरपासून मानधन मिळाले नाही. हाती येणाऱ्या ६,५०० रुपयांमध्ये घरखर्च चालवायचा, दुचाकीत पेट्रोल टाकायचे, असा यक्षप्रश्न असताना तुटपुंजे मानधनही न मिळाल्याने संगणक आॅपरेटर बेसहारा झाले आहेत.