शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

साडेसहा हजार लोकांना रोजगार

By admin | Updated: December 20, 2014 22:29 IST

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार टेक्सटाईल्स कंपन्या येत आहेत. नव्याने तीन कंपन्यांसोबत करार प्रस्तावित आहे. या वस्त्रोद्योग कंपन्या सुरु झाल्यास जिल्ह्यात अडीच हजार कोटींची

नांदगावपेठ एमआयडीसीत अडीच हजार कोटींची गुंतवणूक अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार टेक्सटाईल्स कंपन्या येत आहेत. नव्याने तीन कंपन्यांसोबत करार प्रस्तावित आहे. या वस्त्रोद्योग कंपन्या सुरु झाल्यास जिल्ह्यात अडीच हजार कोटींची गुंतवणूक होऊन साडेसहा हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत आहेत.राज्यात मुंबईतील टाटा टेक्सटाईल मिल, इंदू मिल, पोतदार टेक्सटाईल मिल,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील बंद असलेल्या मील या राष्ट्रीय वस्त्रोद्योग राज्याबाहेर नेण्याचा घाट रचला जात होता. ही बाब निदर्शनास आली तेंव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची १७ डिसेंबर रोजी भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. बंद असलेल्या मिल राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी ना. गडकरी यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्याशी चर्चा केली. हे प्रकल्प अमरावतीत सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. गंगवार यांनी दिले. त्यामुळे ५०० हेक्टर क्षेत्रफळात टेक्सटाईल पार्क उभारण्याची वाटचाल सुरु आहे.कापसाला हक्काची बाजारपेठ मिळणारनांदगावपेठ येथे टेक्सटाईल पार्कमध्ये चार मिल साकारल्या गेल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळेल. कापड निर्मितीसाठी लागणारा कापूस कोणत्या दर्जाचा हवा, त्यानुसार प्रगत तंत्रज्ञान वापरुन कापसाचे उत्पादन घेतले जाईल. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्तेची दारे उघडी होतील. काही वर्षांपासून कापसाचा कमी झालेला पेरा वाढीस लागून शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळतील, शेतकऱ्यांपर्यंत अर्थव्यवस्था पोहचेल, हे विशेष.विमान सेवेने उद्योगधंदाचे युग येणारबेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात विकासाचे युग सुरु होण्याचे संकेत आहे. प्रारंभी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नकार दर्शविला होता. मात्र राज्य शासनाने विदर्भात हवाईविश्व खुले करण्याचा निर्णय घेतल्याने बेलोरा विमातळाचा सर्वागिंण विकास होईल. ३०० कोटींचा हा प्रस्ताव असून शासनाने वेळीच निधी उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांना अमरावतीत ये-जा करणे सुलभ होईल, असे आ. सुनील देशमुख म्हणाले.