शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

साडेसहा हजार लोकांना रोजगार

By admin | Updated: December 20, 2014 22:29 IST

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार टेक्सटाईल्स कंपन्या येत आहेत. नव्याने तीन कंपन्यांसोबत करार प्रस्तावित आहे. या वस्त्रोद्योग कंपन्या सुरु झाल्यास जिल्ह्यात अडीच हजार कोटींची

नांदगावपेठ एमआयडीसीत अडीच हजार कोटींची गुंतवणूक अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार टेक्सटाईल्स कंपन्या येत आहेत. नव्याने तीन कंपन्यांसोबत करार प्रस्तावित आहे. या वस्त्रोद्योग कंपन्या सुरु झाल्यास जिल्ह्यात अडीच हजार कोटींची गुंतवणूक होऊन साडेसहा हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत आहेत.राज्यात मुंबईतील टाटा टेक्सटाईल मिल, इंदू मिल, पोतदार टेक्सटाईल मिल,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील बंद असलेल्या मील या राष्ट्रीय वस्त्रोद्योग राज्याबाहेर नेण्याचा घाट रचला जात होता. ही बाब निदर्शनास आली तेंव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची १७ डिसेंबर रोजी भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. बंद असलेल्या मिल राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी ना. गडकरी यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्याशी चर्चा केली. हे प्रकल्प अमरावतीत सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. गंगवार यांनी दिले. त्यामुळे ५०० हेक्टर क्षेत्रफळात टेक्सटाईल पार्क उभारण्याची वाटचाल सुरु आहे.कापसाला हक्काची बाजारपेठ मिळणारनांदगावपेठ येथे टेक्सटाईल पार्कमध्ये चार मिल साकारल्या गेल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळेल. कापड निर्मितीसाठी लागणारा कापूस कोणत्या दर्जाचा हवा, त्यानुसार प्रगत तंत्रज्ञान वापरुन कापसाचे उत्पादन घेतले जाईल. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्तेची दारे उघडी होतील. काही वर्षांपासून कापसाचा कमी झालेला पेरा वाढीस लागून शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळतील, शेतकऱ्यांपर्यंत अर्थव्यवस्था पोहचेल, हे विशेष.विमान सेवेने उद्योगधंदाचे युग येणारबेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात विकासाचे युग सुरु होण्याचे संकेत आहे. प्रारंभी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नकार दर्शविला होता. मात्र राज्य शासनाने विदर्भात हवाईविश्व खुले करण्याचा निर्णय घेतल्याने बेलोरा विमातळाचा सर्वागिंण विकास होईल. ३०० कोटींचा हा प्रस्ताव असून शासनाने वेळीच निधी उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांना अमरावतीत ये-जा करणे सुलभ होईल, असे आ. सुनील देशमुख म्हणाले.