शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

कर्मचाऱ्यांनी लावली मालमत्तेची वाट

By admin | Updated: December 15, 2015 00:22 IST

स्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे.

खुल्या जागेतील अतिक्रमण : नगराध्यक्ष करणार चौकशीची मागणीसुमित हरकुट चांदूरबाजारस्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे. एकीकडे अतिक्रमण करू नका, असा नारा पालिका लावते, तर दुसरीकडे खुल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना विद्युत पुरवठ्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देते. त्यांच्याकडून करवसुली करून अतिक्रमणधारकांना योजनांचा लाभ देण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविणे पालिकेचे कर्तव्य आहे. असे असताना वॉर्ड क्र. २ मधील उदय कॉलनीजवळील हिंदू स्मशानभूमिला लागून असलेल्या खुल्या जागेवर अतिक्रमितांकडून कर आकारणी केली जात आहे. या अतिक्रमितांना विद्युत जोडणी करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ही खुली जागा सुमारे ४० हजार चौरस फूट असून ती नगरपालिकेच्या मालकीची आरक्षित जागा आहे. चांदूरबाजार शहरात हिंदू व मुस्लिम नागरिकांसाठी वेगवेगळ्या दोन-दोन स्मशानभूमी आहेत. मात्र शहरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असून या समाजाच्या नागरिकांकरिता कोणतीच स्मशानभूमी उपलब्ध नाही. नाईलाजास्तव या समाज बांधवांना दफनविधीनजीकच्या ग्रामीण भागात नेऊन करावा लागतो. यामुळे ख्रिश्चन बंधूंनी नगरपालिकेला ख्रिश्चन स्मशानभूमिकरिता जमिनीची मागणी केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधारांनी स्मशानभूमीकरिता जमीन देण्याचे नाकारले. मात्र हिंदू स्मशानभूमिलाच लागून पालिकेची सुमारे ४० हजार स्क्वेअर फुटाची खुली जागा आहे. याच भागात सर्वाधिक ख्रिश्चन समाजाचे नागरिक अनेक वर्षांपासून राहत आहेत. तरीही या ख्रिश्चन समाजाच्या नागरिकांना स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ख्रिश्चन बांधवांतर्फे होत आहे.अनेक वर्षांपासून ख्रिश्चन बांधवांतर्फे उदय कॉलनी परिसरातील खुल्या जागेत स्मशानभूमीकरिता मागणी करूनही त्यांना जागा देण्यात आली नसून याच जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे उभारली आहेत. अंदाजे ३० अतिक्रममित घरे या परिसरात उभी झाली असून यावर पालिका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. उलट पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हात ओले करून करवसुली केली. तसेच अनेकांना विद्युत जोडणीकरिता नाहरकत पत्रे वाटण्यात आली. मागील २-३ वर्षांत या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणधारकांना विद्युत वितरण कंपनीतर्फे विद्युत जोडणी कशाच्या आधारे देण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही या प्रकरणात पालिकेतील काही नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पालिकेच्या मालमत्तेची ‘वाट’ लावली आहे. पालिका कर्मचाऱ्यांतर्फे पालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे सुरू आहे. या गैरप्रकाराला आळा घालणे आता काळाची गरज झाली आहे. या जागेवरील अतिक्रमण न काढल्यास नगरपालिकेची आणखी एक मालमत्ता अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात जाणार, हे निश्चित आहे. याकडे पालिकेने लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.