शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कर्मचाऱ्यांनी लावली मालमत्तेची वाट

By admin | Updated: December 15, 2015 00:22 IST

स्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे.

खुल्या जागेतील अतिक्रमण : नगराध्यक्ष करणार चौकशीची मागणीसुमित हरकुट चांदूरबाजारस्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे. एकीकडे अतिक्रमण करू नका, असा नारा पालिका लावते, तर दुसरीकडे खुल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना विद्युत पुरवठ्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देते. त्यांच्याकडून करवसुली करून अतिक्रमणधारकांना योजनांचा लाभ देण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविणे पालिकेचे कर्तव्य आहे. असे असताना वॉर्ड क्र. २ मधील उदय कॉलनीजवळील हिंदू स्मशानभूमिला लागून असलेल्या खुल्या जागेवर अतिक्रमितांकडून कर आकारणी केली जात आहे. या अतिक्रमितांना विद्युत जोडणी करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ही खुली जागा सुमारे ४० हजार चौरस फूट असून ती नगरपालिकेच्या मालकीची आरक्षित जागा आहे. चांदूरबाजार शहरात हिंदू व मुस्लिम नागरिकांसाठी वेगवेगळ्या दोन-दोन स्मशानभूमी आहेत. मात्र शहरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असून या समाजाच्या नागरिकांकरिता कोणतीच स्मशानभूमी उपलब्ध नाही. नाईलाजास्तव या समाज बांधवांना दफनविधीनजीकच्या ग्रामीण भागात नेऊन करावा लागतो. यामुळे ख्रिश्चन बंधूंनी नगरपालिकेला ख्रिश्चन स्मशानभूमिकरिता जमिनीची मागणी केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधारांनी स्मशानभूमीकरिता जमीन देण्याचे नाकारले. मात्र हिंदू स्मशानभूमिलाच लागून पालिकेची सुमारे ४० हजार स्क्वेअर फुटाची खुली जागा आहे. याच भागात सर्वाधिक ख्रिश्चन समाजाचे नागरिक अनेक वर्षांपासून राहत आहेत. तरीही या ख्रिश्चन समाजाच्या नागरिकांना स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ख्रिश्चन बांधवांतर्फे होत आहे.अनेक वर्षांपासून ख्रिश्चन बांधवांतर्फे उदय कॉलनी परिसरातील खुल्या जागेत स्मशानभूमीकरिता मागणी करूनही त्यांना जागा देण्यात आली नसून याच जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे उभारली आहेत. अंदाजे ३० अतिक्रममित घरे या परिसरात उभी झाली असून यावर पालिका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. उलट पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हात ओले करून करवसुली केली. तसेच अनेकांना विद्युत जोडणीकरिता नाहरकत पत्रे वाटण्यात आली. मागील २-३ वर्षांत या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणधारकांना विद्युत वितरण कंपनीतर्फे विद्युत जोडणी कशाच्या आधारे देण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही या प्रकरणात पालिकेतील काही नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पालिकेच्या मालमत्तेची ‘वाट’ लावली आहे. पालिका कर्मचाऱ्यांतर्फे पालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे सुरू आहे. या गैरप्रकाराला आळा घालणे आता काळाची गरज झाली आहे. या जागेवरील अतिक्रमण न काढल्यास नगरपालिकेची आणखी एक मालमत्ता अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात जाणार, हे निश्चित आहे. याकडे पालिकेने लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.