शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कर्मचाऱ्यांनी लावली मालमत्तेची वाट

By admin | Updated: December 15, 2015 00:22 IST

स्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे.

खुल्या जागेतील अतिक्रमण : नगराध्यक्ष करणार चौकशीची मागणीसुमित हरकुट चांदूरबाजारस्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे. एकीकडे अतिक्रमण करू नका, असा नारा पालिका लावते, तर दुसरीकडे खुल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना विद्युत पुरवठ्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देते. त्यांच्याकडून करवसुली करून अतिक्रमणधारकांना योजनांचा लाभ देण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविणे पालिकेचे कर्तव्य आहे. असे असताना वॉर्ड क्र. २ मधील उदय कॉलनीजवळील हिंदू स्मशानभूमिला लागून असलेल्या खुल्या जागेवर अतिक्रमितांकडून कर आकारणी केली जात आहे. या अतिक्रमितांना विद्युत जोडणी करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ही खुली जागा सुमारे ४० हजार चौरस फूट असून ती नगरपालिकेच्या मालकीची आरक्षित जागा आहे. चांदूरबाजार शहरात हिंदू व मुस्लिम नागरिकांसाठी वेगवेगळ्या दोन-दोन स्मशानभूमी आहेत. मात्र शहरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असून या समाजाच्या नागरिकांकरिता कोणतीच स्मशानभूमी उपलब्ध नाही. नाईलाजास्तव या समाज बांधवांना दफनविधीनजीकच्या ग्रामीण भागात नेऊन करावा लागतो. यामुळे ख्रिश्चन बंधूंनी नगरपालिकेला ख्रिश्चन स्मशानभूमिकरिता जमिनीची मागणी केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधारांनी स्मशानभूमीकरिता जमीन देण्याचे नाकारले. मात्र हिंदू स्मशानभूमिलाच लागून पालिकेची सुमारे ४० हजार स्क्वेअर फुटाची खुली जागा आहे. याच भागात सर्वाधिक ख्रिश्चन समाजाचे नागरिक अनेक वर्षांपासून राहत आहेत. तरीही या ख्रिश्चन समाजाच्या नागरिकांना स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ख्रिश्चन बांधवांतर्फे होत आहे.अनेक वर्षांपासून ख्रिश्चन बांधवांतर्फे उदय कॉलनी परिसरातील खुल्या जागेत स्मशानभूमीकरिता मागणी करूनही त्यांना जागा देण्यात आली नसून याच जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे उभारली आहेत. अंदाजे ३० अतिक्रममित घरे या परिसरात उभी झाली असून यावर पालिका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. उलट पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हात ओले करून करवसुली केली. तसेच अनेकांना विद्युत जोडणीकरिता नाहरकत पत्रे वाटण्यात आली. मागील २-३ वर्षांत या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणधारकांना विद्युत वितरण कंपनीतर्फे विद्युत जोडणी कशाच्या आधारे देण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही या प्रकरणात पालिकेतील काही नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पालिकेच्या मालमत्तेची ‘वाट’ लावली आहे. पालिका कर्मचाऱ्यांतर्फे पालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे सुरू आहे. या गैरप्रकाराला आळा घालणे आता काळाची गरज झाली आहे. या जागेवरील अतिक्रमण न काढल्यास नगरपालिकेची आणखी एक मालमत्ता अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात जाणार, हे निश्चित आहे. याकडे पालिकेने लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.