शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

एका ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचलबांगडी

By जितेंद्र दखने | Updated: June 20, 2023 18:41 IST

जिल्हा परिषद : विविध विभागांत अनेकजण तळ ठोकूनच

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता एकाच ठिकाणी एका टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनात सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र नुकतेच आटोपले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आपसी, विनंती व प्रशासकीय बदल्यांची कारवाई नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागामार्फत एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची उचलबांगडी करण्याच्या अनुषंगाने माहिती संकलन व विभाग आणि टेबल बदलाची पक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बांधकाम, वित्त, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, समाज कल्याण, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, शिक्षण पंचायत अशा सर्व विभागांत गेल्या पाच वर्षांपासून अनेक कर्मचारी एकाच टेबलवर एकाच ठिकाणी बसून आपले कामकाज करत आहेत.

मात्र शासनाच्या धोरणानुसार एकाच विभागात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे अंतर्गत टेबल बदल किंवा कार्यालय बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने विविध विभागांत गेल्या काही वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याच्या दृष्टीने माहिती संकलन करणे सुरू केले आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून यासाठी केव्हाचा मुहूर्त काढला जातो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.