शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

आपत्कालीन पीक नियोजनच तारणार

By admin | Updated: July 14, 2017 00:38 IST

यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये

सरासरीच्या ५० टक्केच पाऊस : दीड लाख हेक्टरमध्ये पिकांना मोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांना मोड येऊन दुबार पेरणीचे संकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.केंद्र शासनाच्या जिल्हानिहाय पीक आराखडा ‘आयसीएआर’ या संस्थेने ‘सीआरआयडीए’ (सेंटर रिसर्च इंस्टिट्यूट फॉर ड्रायलँड अ‍ॅग्रीकल्चर) यापूर्वीच आराखडा तयार केलेला आहे. कृषी विद्यापीठानेदेखील आपत्कालीन पीक नियोजनाच्या शिफारशी केलेल्या आहेत. पाऊस वेळेवर सुरू न होने, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे आदी हवामानाच्या अनिश्चितीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीमध्ये शेतकऱ्यांनी पीक नियोजन करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्ट्यापासून मिळणारा पाऊस हा विदर्भात ढोबळमानाने एकाचवेळी पडतो. मात्र कमी दाबाचा पट्टा जेव्हा विदर्भात नसतो तेव्हा विदर्भातील पावसाच्या प्रमाणात तालुका व जिल्ह्यात मोठे बदल आढळून येतात. नियमितपणे पावसाळा सुरू होतो तेव्हा तीन दिवसांत विदर्भ व्यापतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून (२४ वा हवामान आठवडा) दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. पावसाळा जर एक, दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास ही आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरल्या जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्येमध्ये बदल करावा लागतो. यासाठीच आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे आहे.पावसाळा दोन ते तीन आठवडे ऊशीरा सुरू झाल्यासपावसाळा दोन ते आठवडे ( २ ते १५ जुलै) उशीरा सुरू झाल्यास अमेरीकन तसेच देशी कपासीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत.साधारणपणे २० टक्के बियाणे जास्त वापरावेत.सुधारित व संकरित वाणांच्या बाबतीत दोन झाडामधील अंतर कमी ठेवावे.मूग, सोयाबीन, उडीद पिकांचा आंतरपीक म्हणून वापर करावा.संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर ही आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रात कापूस : ज्वारी : तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, बियाणे जास्त वापरावेत. पावसाळा १६ ते २२ जुलै म्हणजेच चवथ्या आठवड्यात सुरु झाल्यास २५ टक्के बियाणे अधिक वापरावेत, तर खतांचा २५ टक्के कमी वापर करावा मूग, उडीदाची क्षेत्र कमी करावे किंवा टाळावे.