शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन पीक नियोजनच तारणार

By admin | Updated: July 14, 2017 00:38 IST

यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये

सरासरीच्या ५० टक्केच पाऊस : दीड लाख हेक्टरमध्ये पिकांना मोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांना मोड येऊन दुबार पेरणीचे संकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.केंद्र शासनाच्या जिल्हानिहाय पीक आराखडा ‘आयसीएआर’ या संस्थेने ‘सीआरआयडीए’ (सेंटर रिसर्च इंस्टिट्यूट फॉर ड्रायलँड अ‍ॅग्रीकल्चर) यापूर्वीच आराखडा तयार केलेला आहे. कृषी विद्यापीठानेदेखील आपत्कालीन पीक नियोजनाच्या शिफारशी केलेल्या आहेत. पाऊस वेळेवर सुरू न होने, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे आदी हवामानाच्या अनिश्चितीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीमध्ये शेतकऱ्यांनी पीक नियोजन करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्ट्यापासून मिळणारा पाऊस हा विदर्भात ढोबळमानाने एकाचवेळी पडतो. मात्र कमी दाबाचा पट्टा जेव्हा विदर्भात नसतो तेव्हा विदर्भातील पावसाच्या प्रमाणात तालुका व जिल्ह्यात मोठे बदल आढळून येतात. नियमितपणे पावसाळा सुरू होतो तेव्हा तीन दिवसांत विदर्भ व्यापतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून (२४ वा हवामान आठवडा) दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. पावसाळा जर एक, दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास ही आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरल्या जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्येमध्ये बदल करावा लागतो. यासाठीच आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे आहे.पावसाळा दोन ते तीन आठवडे ऊशीरा सुरू झाल्यासपावसाळा दोन ते आठवडे ( २ ते १५ जुलै) उशीरा सुरू झाल्यास अमेरीकन तसेच देशी कपासीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत.साधारणपणे २० टक्के बियाणे जास्त वापरावेत.सुधारित व संकरित वाणांच्या बाबतीत दोन झाडामधील अंतर कमी ठेवावे.मूग, सोयाबीन, उडीद पिकांचा आंतरपीक म्हणून वापर करावा.संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर ही आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रात कापूस : ज्वारी : तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, बियाणे जास्त वापरावेत. पावसाळा १६ ते २२ जुलै म्हणजेच चवथ्या आठवड्यात सुरु झाल्यास २५ टक्के बियाणे अधिक वापरावेत, तर खतांचा २५ टक्के कमी वापर करावा मूग, उडीदाची क्षेत्र कमी करावे किंवा टाळावे.