शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

आपत्कालीन पीक नियोजनच तारणार

By admin | Updated: July 14, 2017 00:38 IST

यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये

सरासरीच्या ५० टक्केच पाऊस : दीड लाख हेक्टरमध्ये पिकांना मोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांना मोड येऊन दुबार पेरणीचे संकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.केंद्र शासनाच्या जिल्हानिहाय पीक आराखडा ‘आयसीएआर’ या संस्थेने ‘सीआरआयडीए’ (सेंटर रिसर्च इंस्टिट्यूट फॉर ड्रायलँड अ‍ॅग्रीकल्चर) यापूर्वीच आराखडा तयार केलेला आहे. कृषी विद्यापीठानेदेखील आपत्कालीन पीक नियोजनाच्या शिफारशी केलेल्या आहेत. पाऊस वेळेवर सुरू न होने, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे आदी हवामानाच्या अनिश्चितीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीमध्ये शेतकऱ्यांनी पीक नियोजन करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्ट्यापासून मिळणारा पाऊस हा विदर्भात ढोबळमानाने एकाचवेळी पडतो. मात्र कमी दाबाचा पट्टा जेव्हा विदर्भात नसतो तेव्हा विदर्भातील पावसाच्या प्रमाणात तालुका व जिल्ह्यात मोठे बदल आढळून येतात. नियमितपणे पावसाळा सुरू होतो तेव्हा तीन दिवसांत विदर्भ व्यापतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून (२४ वा हवामान आठवडा) दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. पावसाळा जर एक, दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास ही आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरल्या जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्येमध्ये बदल करावा लागतो. यासाठीच आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे आहे.पावसाळा दोन ते तीन आठवडे ऊशीरा सुरू झाल्यासपावसाळा दोन ते आठवडे ( २ ते १५ जुलै) उशीरा सुरू झाल्यास अमेरीकन तसेच देशी कपासीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत.साधारणपणे २० टक्के बियाणे जास्त वापरावेत.सुधारित व संकरित वाणांच्या बाबतीत दोन झाडामधील अंतर कमी ठेवावे.मूग, सोयाबीन, उडीद पिकांचा आंतरपीक म्हणून वापर करावा.संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर ही आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रात कापूस : ज्वारी : तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, बियाणे जास्त वापरावेत. पावसाळा १६ ते २२ जुलै म्हणजेच चवथ्या आठवड्यात सुरु झाल्यास २५ टक्के बियाणे अधिक वापरावेत, तर खतांचा २५ टक्के कमी वापर करावा मूग, उडीदाची क्षेत्र कमी करावे किंवा टाळावे.