शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वन्यप्राण्यांपासून त्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:09 IST

अगोदरच नापिकी, दुष्काळ आणि उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशातच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून त्रस्त असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी वनविभागाचे कार्यालय गाठले. वनाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करून व्यथा मांडल्या.

ठळक मुद्देडीएफओ कार्यालयावर धडक : नुकसानभरपाई मिळण्याची मागणी

अमरावती : अगोदरच नापिकी, दुष्काळ आणि उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशातच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून त्रस्त असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी वनविभागाचे कार्यालय गाठले. वनाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करून व्यथा मांडल्या.येथील इर्विन चौक ते उपवनसंरक्षक कार्यालय दरम्यान शेतकºयांनी मोर्चा काढला. मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून किसान एकता मंचने वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्यथा मांडली. सन १९७२ साली वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला. त्याअनुषंगाने वन्यजीवांची संख्या वाढली. मात्र,जंगलाशेजारील शेतीत वन्यप्राण्यांमुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. हरिण, रोही, रानडुक्कर, माकडं आदी वन्यप्राणी शेतात धुमाकूळ घालत असल्याने उभे पिक फस्त करतात. अलीकडे शेतकरी चौफेर आर्थिक संकटात सापडला असताना, वन्यप्राण्यांपासूनदेखील त्रस्त झाला आहे. शेतात वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यास त्याची भरपाई वर्ष, दोन वर्षे मिळत नाही. कर्ज उभारून शेती करण्याचे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानतून शेतकºयांना मुक्तता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. वन्यजीवांचे संरक्षण झाले पाहिजे मात्र, शेतकरी देखील जगावा ही अपेक्षा किसान एकता मंचने व्यक्त केली. जंगल क्षेत्राच्या प्रमाणात जनावरांची उपलब्धता तपासून ही आकडेवारी निश्चित करावी, जंगल शेजारील शेताला कुंपण मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करु न द्यावा, पिक नुकसानीचे सर्वे करण्यात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची कमिटी निश्चित करण्यात यावी, शेतकºयांच्या पिकांचे नुकसानीची मदत वाढवून ती १५ दिवसांत मिळावी, अशी नियमावली लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी किसान एकता मंचचे संजय कोल्हे, राजेंद्र पारिसे, नगरसेवक दिनेश बुब, सिद्धार्थ वानखडे, नंदकिशोर कुवटे, राजीव तायडे, सतिश पुरी आदी शेतकरी उपस्थित होते.