शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भूमी अधिग्रहणातील बदलाविरोधात एल्गार

By admin | Updated: January 8, 2015 22:47 IST

भूमी अधिग्रहण कायदा सन २०१३ मधील मूळ तरतुदीत अध्यादेशाद्वारे केलेला बदल रद्द करावा यासाठी गुरूवारी किसान एकता मंचने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते

अमरावती : भूमी अधिग्रहण कायदा सन २०१३ मधील मूळ तरतुदीत अध्यादेशाद्वारे केलेला बदल रद्द करावा यासाठी गुरूवारी किसान एकता मंचने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर कायद्यातील बदलाच्या अध्यादेशाची होळी करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.देशातील मूळ भूमी अधिग्रहण कायद्यामधील सन १९९४ च्या अन्यायकारक तरतुदीबाबत पहिल्यांदाच विचार करून सन २०१३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. ज्यामुळे शेतकऱ्यांची जमीन अनेक कारणांकरिता अन्यायकारक पद्धतीने घेण्याच्या पारंपरिक पद्धतीला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९९४ च्या मूळ इंग्रजकालीन कायद्यात ११८ वर्षांनंतर सुधारणा होऊन सुधारित भूमी अधिग्रहण कायदा सर्वसंमतीने संसदेत पारित होऊन १ जानेवारी २०१४ पासून अमलात आला होता. परंतु या कायद्याला सध्याच्या केंद्रातील भाजपा सरकारने त्यावेळी पाठींबा दिला होता. मात्र यात सरकारने आता या कायद्यातील शेतकरी हिताचे कलम वगळण्याच्या दृष्टीने नव्याने अध्यादेश पारित केला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी समूहात मदत न करता त्यांचा कडेलोट करणारा असल्याचा आरोप किसन एकता मंचने केला आहे. या कायद्यामुळे देशभऱ्यातील शेतजमिनी सरकारी किंवा खासगी प्रकल्पाकरिता मूळ मालकाच्या संमतीशिवाय अधिग्रहीत करण्याचा जुलमी अधिकार कायद्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कायद्यातील केंद्र शासनाने बदल त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी किसान एकता मंचने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी संजय कोल्हे, मनोज तायडे, नंदू खेरडे, जगदीश मुरुमकर, गजानन भगत, विजय लिखितकर, बाळासाहेब जवंजाळ, नीलेश अघाते आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)