शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

भूमी अधिग्रहणातील बदलाविरोधात एल्गार

By admin | Updated: January 8, 2015 22:47 IST

भूमी अधिग्रहण कायदा सन २०१३ मधील मूळ तरतुदीत अध्यादेशाद्वारे केलेला बदल रद्द करावा यासाठी गुरूवारी किसान एकता मंचने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते

अमरावती : भूमी अधिग्रहण कायदा सन २०१३ मधील मूळ तरतुदीत अध्यादेशाद्वारे केलेला बदल रद्द करावा यासाठी गुरूवारी किसान एकता मंचने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर कायद्यातील बदलाच्या अध्यादेशाची होळी करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.देशातील मूळ भूमी अधिग्रहण कायद्यामधील सन १९९४ च्या अन्यायकारक तरतुदीबाबत पहिल्यांदाच विचार करून सन २०१३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. ज्यामुळे शेतकऱ्यांची जमीन अनेक कारणांकरिता अन्यायकारक पद्धतीने घेण्याच्या पारंपरिक पद्धतीला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९९४ च्या मूळ इंग्रजकालीन कायद्यात ११८ वर्षांनंतर सुधारणा होऊन सुधारित भूमी अधिग्रहण कायदा सर्वसंमतीने संसदेत पारित होऊन १ जानेवारी २०१४ पासून अमलात आला होता. परंतु या कायद्याला सध्याच्या केंद्रातील भाजपा सरकारने त्यावेळी पाठींबा दिला होता. मात्र यात सरकारने आता या कायद्यातील शेतकरी हिताचे कलम वगळण्याच्या दृष्टीने नव्याने अध्यादेश पारित केला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी समूहात मदत न करता त्यांचा कडेलोट करणारा असल्याचा आरोप किसन एकता मंचने केला आहे. या कायद्यामुळे देशभऱ्यातील शेतजमिनी सरकारी किंवा खासगी प्रकल्पाकरिता मूळ मालकाच्या संमतीशिवाय अधिग्रहीत करण्याचा जुलमी अधिकार कायद्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कायद्यातील केंद्र शासनाने बदल त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी किसान एकता मंचने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी संजय कोल्हे, मनोज तायडे, नंदू खेरडे, जगदीश मुरुमकर, गजानन भगत, विजय लिखितकर, बाळासाहेब जवंजाळ, नीलेश अघाते आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)