शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST

अमरावती : यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेची कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम केलेली नसताना काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी गुगल फाॅर्मच्या माध्यमातून ...

अमरावती : यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेची कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम केलेली नसताना काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी गुगल फाॅर्मच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज मागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी अशा प्रकाराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.

राज्यात दरवर्षी दहावीच्या निकालानंतर महानगरातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आणि उर्वरित राज्यातील प्रवेश स्थानिक पातळीवर केले जातात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, मूल्यमापन पद्धती अद्याप निश्?चित झालेले नाही तसेच महानगरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची आणि उर्वरित राज्यातील अकरावी प्रवेशाची कार्यपद्धती निश्?चित केलेले नाही. असे असताना काही शाळा महाविद्यालयातून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची दिशा निर्देशन शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येणार आहे. यापूर्वी कोणत्याही शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.सदरचे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयानेही जारी केले आहे.