शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदी नाव दुर्घटनेतील अकराही मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:17 IST

फोटो पी १६ वरूड कॉमन वरूड (अमरावती) : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या ...

फोटो पी १६ वरूड

कॉमन

वरूड (अमरावती) : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे १४ सप्टेंबर रोजी वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून एकूण ११ जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशी सापडले होते, तर उर्वरित आठ मृतदेह गुरुवारी सापडले आहेत. बुडालेले सर्व ११ जणांचे मृतदेह गवसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. घटनेच्या दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके तसेच जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी अविरत मदतकार्य करीत होते.

मृतांमध्ये नारायण भोमाजी मटरे (५९), किरण विजय खंडाळे (२८), वंशिका प्रदीप शिवणकर (२), मोनाली उर्फ मोहनी सुखदेव खंडाळे (११), अदिती सुखदेव खंडाळे (१३), निशा नारायण मटरे (२२), पीयूष तुळशीदास मटरे (८), अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (१९), अश्विनी अमर खंडाळे (२५), पूनम प्रदीप शिवणकर (२४) यांचा समावेश आहे.

घटनेच्या दिवशी श्याम मनोहर मटरे (२५) व राजकुमार रामदास उईके (४५) हे दोघे नदीतून पोहत बाहेर आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन दिले. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितच मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

////////////

२२ दिवसात संसार उद्ध्वस्त

मृतांपैकी एका दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले असल्याची माहिती पुढे आहे. अतुल वाघमारे (२५) व वैशाली अतुल वाघमारे (१९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. अवघ्या २२ दिवसांत त्यांच्या सुखी संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अतुल वाघमारे याचे २२ ऑगस्ट रोजी वरूड तालुक्यातील गाळेगाव येथील वैशाली मटारे या तरुणीशी लग्न झाले. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, १४ सप्टेंबर रोजी झुंज येथील वर्धा नदीतील बोट अपघातात दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटेच त्यांचे मृतदेह हाती लागले.

//////

तिसऱ्या दिवशी सापडले आठही मृतदेह

मंगळवारपासून सुरू असलेल्या शोधकार्याला गुरुवारी दुपारी ४ वाजता ब्रेक लागला. बुधवारी दिवसभर शोधकार्य केल्यानंतर निराशेने शोध पथक झोपी गेले. गुरुवारी पहाटे ५.३० पासून शोधकार्याला पुन्हा सुरुवात झाली. यात सर्वप्रथम पीयूष तुलसीदास मटरे या बालकाचा मृतदेह घटनस्थळापासून ७ ते ८ किमीवरील हातुर्णानजीक सापडला. पाठोपाठ सहाही मृतदेह पथकाच्या हाती लागले. दुपारी ४ वाजता एका मुलीचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

//////////////

घटनास्थळावरच झाले शवविच्छेदन

मृतदेहांना दुर्गंधी येत असल्याने प्रशासनाने तीर्थक्षेत्र झुंज येथेच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष बदनावरे यांनी सात मृतदेहांचे घटनास्थळावर, तर एकाचे रुग्णालयात शवविच्छेदन केले आणि तेथून मृतदेह प्रशासनाने त्यांच्या गावी रुग्णवाहिकेतून पोहचवून दिले. यावेळी नातेवाईकांच्या रुदनाने उपस्थितांना गहिवर दाटून आला होता.