शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंभोरा पंपाची वीज खंडित, पाणी पुरवठाही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने ...

ठळक मुद्देपर्यायी सुविधाच नाही : अमरावतीकर नियमित पाण्याच्या प्रतिक्षेत, दिवसाआड पाणीपुरवठाही धड नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अमरावती शहरात ९० हजारांवर ग्राहक असून त्या पाणीपुरवठ्यावर लाखो अमरावतीकरांची दिनचर्या अवलंबून आहे. पाण्याशिवाय सकाळची सुरुवात कशी करावी, असा प्रश्नच आहे. पाणीबचतीचा मुलमंत्र देणारी मजीप्रा आता एकदिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. ते अमरावतीकरांनी समजून घेतले. मजीप्राला सहकार्य केले. अधूनमधून पाईपलाईनच्या काही कामानिमीत्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचेही अमरावतीकर मान्य केले. मात्र, आता पाणीबंदचे नवीन सकंटच पुढे आले आहे. महावितरणाचा विज पुरवठा बंद असला की पाणी पुरवठा बंद होऊ लागला आहे. सिंभोरा धरण परिसरातील विज खंडीत झाल्यावर मजीप्राचे पंपही बंद होतात. तासनतास वीज पुरवठा सुरळित केला जात नाही, ती प्रक्रिया संथ गतीने चालते. परिणामी अमरावतीकर नळात पाणी कधी येईल, या अपेक्षेने प्रतिक्षेतच असतात. मात्र, अमरावतीकरांच्या भावनेशी मजीप्रा व महावितरणला काही देणघेणे नाही. सिंभोरा पंपाला वीज पुरवठा करणाºया महावितरणाला मजीप्रा वर्षाकाठी १२ कोटीची रक्कम देते.

अंबानगरीसाठी शोकांतिकाचत्या मोबदल्यात महाराष्ट्र जीव प्राधिकरणला स्टँडबाय वीजपुरवठा सुविधा द्यावी. तसे केल्यास सिंभोरा धरणावरी पंप काही वेळात पूर्वरत होऊन पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. मात्र, तशी सोयच गेल्या अनेक वर्षांपासून नाही. वीजपुरवठा खंडीत झाला की दुसºया लाईनवरून वीजपुरवठा सुरू करण्याची सोय मजीप्राने वीज वितरणाकडून घेतल्यास हे पाणी संकट दूर होऊ शकते.मात्र, याची दखलच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा महावितरण घेत नसल्याने अमरावतीकरांना, तिन्ही ऋतुमध्ये अशाच पाणी सकंटाला सामोरे जावे लागत आहे. ही अंबानगरीसाठी शोकांतिकाच आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.महावितरणकडून विद्यूत पुरवठा बंद झाला की सिंभोराचे पंप बंद पडतात. परिणामी पाणी पुरवठा बंद होतो. मजीप्रा महावितरणाला दरवर्षाला १२ कोटींचे देयक भरते. त्यांनी स्टँडबाय सुविधा करून वीज पुरवठा सुरू ठेवण्याची सुविधा पुरवायला हवी. आम्हीही तसे प्रयत्न करीत आहोत.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता. मजीप्रा.