शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंभोरा पंपाची वीज खंडित, पाणी पुरवठाही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने ...

ठळक मुद्देपर्यायी सुविधाच नाही : अमरावतीकर नियमित पाण्याच्या प्रतिक्षेत, दिवसाआड पाणीपुरवठाही धड नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अमरावती शहरात ९० हजारांवर ग्राहक असून त्या पाणीपुरवठ्यावर लाखो अमरावतीकरांची दिनचर्या अवलंबून आहे. पाण्याशिवाय सकाळची सुरुवात कशी करावी, असा प्रश्नच आहे. पाणीबचतीचा मुलमंत्र देणारी मजीप्रा आता एकदिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. ते अमरावतीकरांनी समजून घेतले. मजीप्राला सहकार्य केले. अधूनमधून पाईपलाईनच्या काही कामानिमीत्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचेही अमरावतीकर मान्य केले. मात्र, आता पाणीबंदचे नवीन सकंटच पुढे आले आहे. महावितरणाचा विज पुरवठा बंद असला की पाणी पुरवठा बंद होऊ लागला आहे. सिंभोरा धरण परिसरातील विज खंडीत झाल्यावर मजीप्राचे पंपही बंद होतात. तासनतास वीज पुरवठा सुरळित केला जात नाही, ती प्रक्रिया संथ गतीने चालते. परिणामी अमरावतीकर नळात पाणी कधी येईल, या अपेक्षेने प्रतिक्षेतच असतात. मात्र, अमरावतीकरांच्या भावनेशी मजीप्रा व महावितरणला काही देणघेणे नाही. सिंभोरा पंपाला वीज पुरवठा करणाºया महावितरणाला मजीप्रा वर्षाकाठी १२ कोटीची रक्कम देते.

अंबानगरीसाठी शोकांतिकाचत्या मोबदल्यात महाराष्ट्र जीव प्राधिकरणला स्टँडबाय वीजपुरवठा सुविधा द्यावी. तसे केल्यास सिंभोरा धरणावरी पंप काही वेळात पूर्वरत होऊन पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. मात्र, तशी सोयच गेल्या अनेक वर्षांपासून नाही. वीजपुरवठा खंडीत झाला की दुसºया लाईनवरून वीजपुरवठा सुरू करण्याची सोय मजीप्राने वीज वितरणाकडून घेतल्यास हे पाणी संकट दूर होऊ शकते.मात्र, याची दखलच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा महावितरण घेत नसल्याने अमरावतीकरांना, तिन्ही ऋतुमध्ये अशाच पाणी सकंटाला सामोरे जावे लागत आहे. ही अंबानगरीसाठी शोकांतिकाच आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.महावितरणकडून विद्यूत पुरवठा बंद झाला की सिंभोराचे पंप बंद पडतात. परिणामी पाणी पुरवठा बंद होतो. मजीप्रा महावितरणाला दरवर्षाला १२ कोटींचे देयक भरते. त्यांनी स्टँडबाय सुविधा करून वीज पुरवठा सुरू ठेवण्याची सुविधा पुरवायला हवी. आम्हीही तसे प्रयत्न करीत आहोत.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता. मजीप्रा.