शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

पहिल्याच पावसात वीज कंपनीची पोलखोल

By admin | Updated: June 19, 2014 23:34 IST

मंगळवारी अमरावतीत मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने विद्युत विभागाची पोलखोल केली. सौम्य वाऱ्यासह आलेल्या पावसानेसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अर्ध्या अमरावतीकरांना रात्र अंधारात

अर्ध्या अमरावतीत काळोख : वीज कंपनी करते तरी काय?अमरावती : मंगळवारी अमरावतीत मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने विद्युत विभागाची पोलखोल केली. सौम्य वाऱ्यासह आलेल्या पावसानेसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अर्ध्या अमरावतीकरांना रात्र अंधारात काढावी लागली. नागरिकांकडून विजेची भरमसाठ देयके वसूल करण्यात वीज कंपनी नेहमीच अग्रेसर असते. एक महिन्याच्या थकीत देयकाकरिता ग्राहकांचा वीजपुुरवठा खंडित केला जातो. मात्र ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याकडे मात्र वीज कंपनी दुर्लक्ष करीत आहे. उपचार सुरू असताना त्यांना लावण्यात आलेले सलाईन संपल्यानंतरही कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व परिचारिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. श्रीराम दयालकर यांचा मुलगा श्रीकांत हा सैन्यात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.वीज प्रवाह सुरळीत करण्याकरिता विज कंपनीकडे मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा फौज फाटा आहे. तसेच हजारो कर्मचारीही कार्यरत आहेत. मात्र तरीही वीजपुरवठा करण्यात वीज कंपनी असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता अनेक ग्राहक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करीतच राहतात. मात्र तरीही ग्राहंकांचे योग्य समाधान वीज कंपनी कर्मचारी करीत नाही, अशी ओरड नेहमीच होत आहे. केन्द्र शासनाच्या विद्युत अधिनियम २००३ नुसार जिल्हास्तरीय विद्युतीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी अमरावती जिल्हा विद्युतीकरण समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासनाकडूुन वीज कंपनीला आतापर्यंत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून विद्युतीकरणाचे कार्य युध्द स्तरावर सुरू आहे. मात्र कामात हलगर्जीपणाचे भाव विज कंपनी कर्मचारी दाखवित आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असतानाही विद्युत वितरण कंपनीचा कामकाज संथगतीने होत आहे. मागील काही दिवसांपासून मेळघाटातील काही भागात विद्युत पुरवठा खंडीत आहे.तसेच जिल्हातील काही गावामध्ये अंधार असल्याचे लोकप्रतिनिधीनी जिल्हा विद्यतीकरण समन्वय बैठकती सांगितले मात्र अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश मिळाले नाही. मंगळवारी सायंकाळनंतर अमरावतीत पावसाच्या सरी बरसल्या. पाऊस सुरु होताच अर्ध्या अमरावतीत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सर्वत्र काळोख पसरला होता.