शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

दीड हजार शाळांना वीज बिलांचा ‘शॉक’

By admin | Updated: November 9, 2014 22:25 IST

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक शाळांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना या शाळांची वीज बिले व्यावसायिक दराने आकारली जातात. त्यामुळे दीड हजार शाळांना वीज बिलांचा शॉक बसला आहे़

मोहन राऊत - अमरावतीजिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक शाळांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना या शाळांची वीज बिले व्यावसायिक दराने आकारली जातात. त्यामुळे दीड हजार शाळांना वीज बिलांचा शॉक बसला आहे़ परिणामी गत पंधरवाड्यात आठशे शाळांची बत्ती गुल झाली आहे़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १ हजार ५९९ असून २४ माध्यमिक शाळा आहेत. खासगी शाळांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे़ या शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात आहे़ ३५० युनिटच्यावर जादा दराने वीज बिल आकारले जात आहे. शाळास्तरावर वीज बिले भरण्याची तरतूद नाही़ त्यामुळे मुख्याध्यापक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दरमहा भरमसाठ रकमेमुळे जिल्ह्यातील १२०० शाळांची वीज बिले दोन महिन्यांपासून थकीत आहेत. वीज मंडळाने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे़ आतापर्यंत वीज मंडळाने तब्बल ८०० शाळांची बत्ती गूल केली आहे़बहुतांश शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहेत. संगणकाच्या माध्यमातून शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, इ-लर्निंग सुविधा उपलब्ध झाल्या आहेत़ परंतु शाळा ही अनुत्पादित संस्था असतानाही तसेच कोणताही व्यवसायिक भाग नसताना वीज कंपनी व्यवसायिक दराने वीज बिलांची आकारणी करीत आहे़ इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या शाळांचे अनुदान बंद करण्यात आल्याने या शाळांना जादा बिले भरताना अडचणी येतात.