शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

उमेदवारांनाच नाही मताधिकार...

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 27, 2023 18:06 IST

१२ बाजार समित्यांची निवडणूक, १५ संचालक पदांसाठी शेतकरी दावेदार

अमरावती : बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील १५ संचालक पदांसाठी १० आर क्षेत्र धारण करणारे शेतकरी उमेदवार राहू शकतात. परंतु या उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसल्याने त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. उमेदवारांनाच स्वत:ला मत देण्याचा अधिकार नसल्याने यावेळची निवडणूक विशेष चर्चिली जात आहे.

बाजार समितीचे अंतरंग शेतकऱ्यांशी निगडित असताना त्यांना या निवडणुकीत उमेदवार म्हणून राहता येत नव्हते. त्यामुळे यावेळी शासनाने १० आर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना बाजार समतीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहता येईल, असा कायदा केला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा केलेली आहे व यासंबंधी १५ मार्च २०२३ रोजी राजपत्रदेखील अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. जिल्ह्यात साधारणपणे ४.२० लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच सहकारात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, या शेतकरी उमेदवाराचे नाव संबंधित बाजार समितीच्या मतदार यादीत नसल्याने त्याचा मतदानाचा हक्क हिरावला गेलेला आहे. यासाठी शेतकरी उमेदवार निवडणूक लढवीत असलेल्या ग्रामपंचायत किंवा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील मतदारांवर निर्भर राहावे लागणार असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रElectionनिवडणूकAmravatiअमरावती