शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख मतदारांनी मतदानाकडे फिरविली पाठ

By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत आठ मतदारसंघ मिळून असलेल्या एकूण २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी १४ लाख २२ हजार ८५७ मतदारांनीच

अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत आठ मतदारसंघ मिळून असलेल्या एकूण २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी १४ लाख २२ हजार ८५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ७ लाख ९८ हजार ७६६ मतदारांनी मतदानाला खो दिला असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळदरम्यान मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत आठही विधानसभा मतदारसंघात १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या भाग्याचा अंतिम निर्णय रविवार मतमोजणीतून दिसून येणार आहे.जिल्ह्यात आठही मतदान संघांकरिता बुधवारी (१५ आॅक्टोबर) मतदान पार पडले. ७ लाख ७८ हजार २६१ पुरुष व ६लाख ४४ हजार ५९२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत दोनने वाढ झाली. बुधवारी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ६ वाजताची वेळ असताना मेळघाट मतदारसंघातील चार केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. यावर्षी मतदारसंघामध्ये मतदाना संदर्भात उत्सुकता दिसून आली. मागील वर्षीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदान २ टक्क्यांनी वाढले असले तरी प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे कोण आघाडीवर राहील हे संभ्रम निकालानंतरच दूर होईल. सर्वाधिक मतदान यावेळी अचलपूर मतदार संघात आहे. येथे ७०.३७ टक्के मतदान झाले आहेत. यावेळी जिल्ह्यात २२ लाख २१ हजार ६२३ मतदार असताना १४ लाख २२ हजार ७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानामध्ये ६७ टक्के पुरुषांनी तर ६० टक्के महिलांनी मतदान केल्याची नोंद आहे. यामध्ये चार तृतीपंथीचादेखील समावेश आहे. मतदानाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी ६४.११ इतकी आहे. यामध्ये सर्वात कमी मतदान हे अमरावती मतदारसंघात झाले आहे. येथे ५५.७४ टक्के मतदानाची नोंद असून त्या पाठोपाठ बडनेरा मतदारसंघात ५६.०८ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मेळघाट मतदानात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी अचलपूर मतदारसंघात व्हीव्हीपॅटचा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याने येथे मतदानाची टक्केवारी वाढल्याची चर्चा आहे.